शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

११ हजार लोकांची पाण्यासाठी तडफड

By admin | Updated: May 8, 2014 15:16 IST

जनतेचे हाल : शासनाचा पाणीपुरवठा अपुरा...

 रत्नागिरी : यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी असली तरी टंचाईग्रस्त गावातील १० हजार ७८९ लोकांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. शासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. जिल्ह्यात अवेळी पडणारा पाऊस, गारा यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही होत असल्याने लोक हैराण झाले आहेत. त्यातच नाले, ओढे, विहिरी, विंधन विहिरी आटल्याने टंचाईग्रस्त गावांतील गुरेही पाण्यासाठी तडफडत आहेत. आज टंचाईग्रस्तांचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ४१ गावांतील ६७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा उद्रेक झाला आहे. या टंचाईग्रस्तांना एक ते दोन दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आजच्या दिवशी ६२ गावातील १३३ वाड्यांना २० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. डोंगरदर्‍यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या वाड्या डोंगरदर्‍यामध्ये असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे येथील विहिरी, विंधन विहिरी, ओढे, झरे आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरत करावी लागते. टंचाईग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी अवेळी पडणार्‍या पावसाचा परिणाम म्हणून गतवर्षीपेक्षा ती कमीच आहे. कारण पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्याने पाण्याची पातळी खालावत नाही. मात्र, ज्या गावातील वाड्यांमध्ये सध्या पाणीटंचाई सुरु आहे. त्या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, इतर वापरासाठी लागणारे पाणी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी टंचाईग्रस्त भागातील लोकांचे हाल होत आहेत, (शहर वार्ताहर)