शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

सहलीच्या टेम्पोला अपघात; २७ जखमी

By admin | Updated: August 21, 2014 00:51 IST

नऊ जणांची प्रकृती गंभीर : रामलिंग येथील घटना

हातकणंगले : खोची (ता. हातकणंगले) येथील खोची हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहलीचा आयशर टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात २७ जण जखमी झाले आहेत. यातील सात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. ही दुर्घटना आज, बुधवारी दुपारी रामलिंग (ता. हातकणंगले) येथे घडली. जखमींमध्ये दोन शिक्षकांसह २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खोची येथील खोची हायस्कूलचे सुमारे ९० विद्यार्थी व शिक्षक आयशर टेम्पो (एमएच ४३ इ २९७३) ने हातकणंगले तालुक्यातील रामलिंग तीर्थक्षेत्रावर सहलीसाठी आले होते. रामलिंग तीर्थक्षेत्र डोंगराच्या कुशीत वसले असून तेथे तीव्र उताराचा रस्ता आहे. दुपारी परत येताना तीव्र उतारावर गाडीचा वेग न आवरल्याने टेम्पो तीव्र उतारावरून खाली पडून पलटी झाला. टेम्पो मध्येच असलेल्या झाडाला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला.या अपघातात एकूण २७ जण जखमी झाले असून, जखमींमध्ये दोन शिक्षकांचाही समावेश आहे. अपघातानंतर तत्काळ शासकीय रुग्णवाहिका व स्वप्निल नरुटे या युवकांनी स्वत:च्या रुग्णवाहिकेतून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यापैकी २० जण किरकोळ ) जखमी असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. योगेश सुनील हुंगने (वय १५, रा. भेंडवडे), सम्मेद धोंडू डांगे (१०, रा. दूधगाव), सौरभ विनोद कांबळे (१३, रा. बुवाचे वठार), निखिल हणमंत चव्हाण (१६, रा. भेंडवडे), अनिकेत मोहन चौगुले (१५, रा. बु. वाठार), ऋषिकेष सदाशिव कोळी (१४, रा. भेंडवडे), ऋतुराज विलास पाटील (१२, रा. खोची) अशी या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारार्थ वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजूबाबा आवळे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. अपघाताची वर्दी राजेंद्र धुळा गुरव (रा. आळते) यांनी हातकणंगले पोलिसांत दिली असून, घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. टेम्पो चालक अरुण सुकुमार गुजर (रा. दुधगाव, ता. मिरज) याला पोलिसांनी अटक केली आहे.