शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

पानटपरीतही तार्इंचे सु‘मन’ रमले! जिद्दीने व्यवसाय : संसाराला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:24 IST

कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत आपल्या संसाराला हातभार लावला आहे. त्यांच्याबद्दल कुतूहलाची व आदराची भावनाही येथे ग्राहक म्हणून येणाºया प्रत्येकाच्या चेहºयावर दिसून येते.पानटपरीचा व्यवसाय व्यसनाशी निगडित असल्याने याठिकाणी प्रत्येक थरातील लोक येतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस अंगी असल्याने सुमन मावशींना ही जबाबदारी तशी फारशी अवघड वाटली नाही. त्यांनी आपले मार्गक्रमण अखंडपणे सुरू ठेवले.पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे जन्मलेल्या सुमन मावशींचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले. त्यांचा विवाह कोल्हापुरातील आनंद बुढ्ढे यांच्याशी झाला.सासरे तसेच कुटुंबीय मनमिळावू परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक पर्याय हा गरजेचा होता. त्यामुळे त्यांनी निव्वळ व्यवहारज्ञानाच्या जोरावर घरगुती शाकाहारी खानावळ सुरू केली. त्यासोबत भडंग विकणे, घरोघरी फिरून गृहोपयोगी वस्तंूची विक्री करणे, परिसरातील मुलांना शाळेत सोडणे व आणणे अशी विविध प्रकारची कामे केली. त्यातून त्यांनी संसाराचा आर्थिक गाडा सुरळीत केला. त्यांची मुले शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली व त्यांचे संसारही उभे राहिले. त्यामुळे मुलांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला; परंतु अंगातील कष्टाची सवय मावशींना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी सासºयांचा पानटपरीचा पारंपरिक व्यवसाय हाती घेतला. सासºयांनी तो १९७० साली सुरु केला होता. सध्या घरातील सर्व कामे आवरून पानटपरीमध्ये दिवसातील किमान सहा ते आठ तास व्यस्त असतात. कधी-कधी त्यांना विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते; परंतु आपला अनुभव व हजरजबाबीपणा या दोन अंगभूत गुणांच्या जोरावर या अनुभवांना धीरोदात्तपणे त्या सामोरे गेल्या. त्यांना त्यांचे दिरही या कामी मदत करतात. या अंगभूत गुणांच्या जोरावर एक महिला पानपट्टीसारखा व्यवसायही अत्यंत कुशलतेने करू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.घामावर विश्वाससुमनमावशींनी आयुष्यात कधीही लॉटरीचे तिकीट काढले नाही; कारण घामाचा पैसा हाच जीवनात सार्थकी लागतो; त्यामुळे कष्टाची साथ कधीच सोडायची नाही, असा दृढनिश्चय करून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.शारीरिक कष्ट कुठे वाया जात नाहीत. देवाने मनुष्याला चांगले शरीर व बुद्धी दिलेली आहे. हीच एक संधी समजून काम करीत राहावे; म्हणजे त्याचे फळ आपोआपच चांगले मिळते. - सुमन बुढ्ढे