शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

पानटपरीतही तार्इंचे सु‘मन’ रमले! जिद्दीने व्यवसाय : संसाराला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:24 IST

कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत आपल्या संसाराला हातभार लावला आहे. त्यांच्याबद्दल कुतूहलाची व आदराची भावनाही येथे ग्राहक म्हणून येणाºया प्रत्येकाच्या चेहºयावर दिसून येते.पानटपरीचा व्यवसाय व्यसनाशी निगडित असल्याने याठिकाणी प्रत्येक थरातील लोक येतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस अंगी असल्याने सुमन मावशींना ही जबाबदारी तशी फारशी अवघड वाटली नाही. त्यांनी आपले मार्गक्रमण अखंडपणे सुरू ठेवले.पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे जन्मलेल्या सुमन मावशींचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले. त्यांचा विवाह कोल्हापुरातील आनंद बुढ्ढे यांच्याशी झाला.सासरे तसेच कुटुंबीय मनमिळावू परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक पर्याय हा गरजेचा होता. त्यामुळे त्यांनी निव्वळ व्यवहारज्ञानाच्या जोरावर घरगुती शाकाहारी खानावळ सुरू केली. त्यासोबत भडंग विकणे, घरोघरी फिरून गृहोपयोगी वस्तंूची विक्री करणे, परिसरातील मुलांना शाळेत सोडणे व आणणे अशी विविध प्रकारची कामे केली. त्यातून त्यांनी संसाराचा आर्थिक गाडा सुरळीत केला. त्यांची मुले शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली व त्यांचे संसारही उभे राहिले. त्यामुळे मुलांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला; परंतु अंगातील कष्टाची सवय मावशींना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी सासºयांचा पानटपरीचा पारंपरिक व्यवसाय हाती घेतला. सासºयांनी तो १९७० साली सुरु केला होता. सध्या घरातील सर्व कामे आवरून पानटपरीमध्ये दिवसातील किमान सहा ते आठ तास व्यस्त असतात. कधी-कधी त्यांना विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते; परंतु आपला अनुभव व हजरजबाबीपणा या दोन अंगभूत गुणांच्या जोरावर या अनुभवांना धीरोदात्तपणे त्या सामोरे गेल्या. त्यांना त्यांचे दिरही या कामी मदत करतात. या अंगभूत गुणांच्या जोरावर एक महिला पानपट्टीसारखा व्यवसायही अत्यंत कुशलतेने करू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.घामावर विश्वाससुमनमावशींनी आयुष्यात कधीही लॉटरीचे तिकीट काढले नाही; कारण घामाचा पैसा हाच जीवनात सार्थकी लागतो; त्यामुळे कष्टाची साथ कधीच सोडायची नाही, असा दृढनिश्चय करून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.शारीरिक कष्ट कुठे वाया जात नाहीत. देवाने मनुष्याला चांगले शरीर व बुद्धी दिलेली आहे. हीच एक संधी समजून काम करीत राहावे; म्हणजे त्याचे फळ आपोआपच चांगले मिळते. - सुमन बुढ्ढे