शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पानटपरीतही तार्इंचे सु‘मन’ रमले! जिद्दीने व्यवसाय : संसाराला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 01:24 IST

कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : पानटपरीचा व्यवसाय हा पुरुषांनीच करावा, असा एक समज. परंतु तो खोटा ठरवीत लक्ष्मीपुरीतील सुमन आनंद बुढ्ढे (सुमन मावशी) यांनी धाडसाने या व्यवसायात पाऊल टाकत आपल्या संसाराला हातभार लावला आहे. त्यांच्याबद्दल कुतूहलाची व आदराची भावनाही येथे ग्राहक म्हणून येणाºया प्रत्येकाच्या चेहºयावर दिसून येते.पानटपरीचा व्यवसाय व्यसनाशी निगडित असल्याने याठिकाणी प्रत्येक थरातील लोक येतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचे धाडस अंगी असल्याने सुमन मावशींना ही जबाबदारी तशी फारशी अवघड वाटली नाही. त्यांनी आपले मार्गक्रमण अखंडपणे सुरू ठेवले.पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे जन्मलेल्या सुमन मावशींचे शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झाले. त्यांचा विवाह कोल्हापुरातील आनंद बुढ्ढे यांच्याशी झाला.सासरे तसेच कुटुंबीय मनमिळावू परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक पर्याय हा गरजेचा होता. त्यामुळे त्यांनी निव्वळ व्यवहारज्ञानाच्या जोरावर घरगुती शाकाहारी खानावळ सुरू केली. त्यासोबत भडंग विकणे, घरोघरी फिरून गृहोपयोगी वस्तंूची विक्री करणे, परिसरातील मुलांना शाळेत सोडणे व आणणे अशी विविध प्रकारची कामे केली. त्यातून त्यांनी संसाराचा आर्थिक गाडा सुरळीत केला. त्यांची मुले शिकून स्वत:च्या पायावर उभी राहिली व त्यांचे संसारही उभे राहिले. त्यामुळे मुलांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला; परंतु अंगातील कष्टाची सवय मावशींना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी सासºयांचा पानटपरीचा पारंपरिक व्यवसाय हाती घेतला. सासºयांनी तो १९७० साली सुरु केला होता. सध्या घरातील सर्व कामे आवरून पानटपरीमध्ये दिवसातील किमान सहा ते आठ तास व्यस्त असतात. कधी-कधी त्यांना विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते; परंतु आपला अनुभव व हजरजबाबीपणा या दोन अंगभूत गुणांच्या जोरावर या अनुभवांना धीरोदात्तपणे त्या सामोरे गेल्या. त्यांना त्यांचे दिरही या कामी मदत करतात. या अंगभूत गुणांच्या जोरावर एक महिला पानपट्टीसारखा व्यवसायही अत्यंत कुशलतेने करू शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.घामावर विश्वाससुमनमावशींनी आयुष्यात कधीही लॉटरीचे तिकीट काढले नाही; कारण घामाचा पैसा हाच जीवनात सार्थकी लागतो; त्यामुळे कष्टाची साथ कधीच सोडायची नाही, असा दृढनिश्चय करून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.शारीरिक कष्ट कुठे वाया जात नाहीत. देवाने मनुष्याला चांगले शरीर व बुद्धी दिलेली आहे. हीच एक संधी समजून काम करीत राहावे; म्हणजे त्याचे फळ आपोआपच चांगले मिळते. - सुमन बुढ्ढे