शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

अंबेनळी घाटातून प्रवास करताय... सावधान !

By admin | Updated: July 21, 2014 23:10 IST

महाबळेश्वर : गर्द धुके, पाऊस देतोय वाहनचालकांना चकवा

महाबळेश्वर : सर्वाधिक पर्जन्यमानाचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरला पावसाळ्यात देखील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. महाबळेश्वरला येण्यासाठी पसरणी व अंबेनळी असे दोन घाट आहेत. सध्या येथे पाऊस आणि गर्द धुके असल्यामुळे अंबेनळी घाटातून येणाऱ्या पर्यटकांबरोबरच वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असणारा अंबेनळी घाट हा वाहतुकीसाठी नेहमीच धोकादायक मानला जातो. अरुंद रस्ता, चढ-उतार आणि नागमोडी वळणे यामुळे या घाटात सतत लहान-मोठे अपघात होत असतात. अंबेनळी घाटातून महाबळेश्वरला येणाऱ्या नवख्या पर्यटकांची मात्र यामुळे फसगत होताना दिसते.अंबेनळी घाट हा निसर्गसौंदर्याने नटला असल्याने काही हौशी पर्यटक या घाटातून प्रवास करतात; परंतु पावसाळ्यात या घाटातून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे असते. पावसामुळे या घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडत असतात. कित्येक वेळी गर्द धुक्यामुळे वळण नजरेस पडत नसल्याने चालकांची फसगत होऊन दुर्घटना देखील होतात. गेल्या वर्षभरात या घाटात लहान-मोठ्या किती तरी दुर्घटना झाल्या आहेत. दुर्घटनांमध्ये जीवित हानी झाली नसली तरी कित्येक जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहन घाटातून दरीत कोसळल्यास ते पुन्हा बाहेर काढता येईल की नाही, हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी पर्यटकांबरोबरच अन्य वाहनचालकांना वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)महाबळेश्वरला पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना गर्द धुके हे मुख्य कारण आहे. अंबेनळी घाटातून कोकणात दररोज शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असतात. रस्ता अरुंद असल्याने बऱ्याच वेळेस घाटात वाहतूक खोळंबली जाते. तर काही वेळेस चालकांना अंदाज न आल्याने तीव्र उताराच्या वळणावर वाहनांवर नियंत्रण आणणे कठीण बनते. अशा वेळी अपघात झाल्यास धुक्यामुळे मदत कार्यातही मोठा अडथळा येत असतो. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील तत्परते घटनास्थळी पोहोचून मदत करावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.याकडे लक्ष द्या...-घाटात वाहनांचा वेग कमी ठेवणे-गर्द धुके व पावसात प्रवास टाळावा-अवजड साहित्याची वाहतूक टाळावी-रात्रीच्या वेळी हेडलाईटला पिवळ्यारंगाच्या जिलेटीन कागदाचा वापर करावा-त्यामुळे धुक्यातून मार्ग काढणे सोपे जातेकाय हवे...-रस्त्यावर रिफ्लेक्टर-धोक्याच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक-मजबूत कठडे-जागोजागी हेल्पलाइन नंबर