शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

महामार्गालगतच्या गावांना अपघाताची झळ

By admin | Updated: August 9, 2014 00:32 IST

पुणे-बंगलोर महामार्ग : नऊ गावांसाठी मृत्यूचा सापळा ?; उपाययोजनांची गरज

मोहन सातपुते - उचगाव -- पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गालगतच्या गांधीनगर, तावडे हॉटेल, उचगाव फाटा, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मयूर पेट्रोल पंप, गोकुळ शिरगाव ब्रिज, लक्ष्मी टेकडी, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे वळणाऱ्या या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय महामार्गालगतच्या या गावांना अपघाताची झळ सोसावी लागत आहे. यामुळे महामार्गाजवळ असणाऱ्या नऊ गावांना हा मृत्यूचा सापळा ठरतो आहे.या महामार्गावर स्पीड ब्रेकर नाहीत, रस्ता ओलांडण्याकरिता झेब्रा क्रॉसिंग नाही किंवा भुयारी मार्ग नाहीत. तसेच पुढे गाव आहे, असा फलक देखील नाही. त्यामुळे सुसाट वेगाने येणारी वाहने धोकादायक ठरत आहेत.या महामार्गावर दररोज पाच ते सहा अपघात होत आहेत. या अपघातांची कारणेही वेगवेगळी आहेत. चालकाला लागलेली डुलकी, वाहनांवर नियंत्रण नसणे, ओव्हरटेक, मद्यपान, वळणाचा अंदाज न येणे, ईर्ष्या, वाहनांमधील कर्णकर्कश गाण्याचा आवाज, पाठीमागील वाहनांकडे दुर्लक्ष, वाहनांमध्ये फोनवर बोलणे, तर अवजड वाहनांमध्ये प्रवासी घेऊन वाहतूक करणे, दुचाकी चालकांचे हेडफोन्स आणि वाहनांवर वेग नियंत्रण नसणे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात २०१३ मध्ये ११ हजार ७ मोठे अपघात झाले, तर १२ हजार १९४ जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. खेड्यापाड्यांतून आलेल्या वाहनधारकांना महामार्गावरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या या वाहनधारकांना आपल्या वाहनाची ना घरच्या लोकांची काळजी, यामुळे रस्ते अपघातांमध्ये वाहनांसह मनुष्यहानी ही चिंतेची बाब झाली आहे. महामार्ग पोलीस रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असले, तरी वाहनधारक त्यांनाही ओव्हरटेक करीत आहेत. कागलकडून येणारी वाहने गोकुळ शिरगाव गावाजवळ मोठ्या प्रमाणात अपघात घडवीत आहेत. उजळाईवाडी, सायबरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत अपघात घडतात. मयूर पेट्रोल पंपाशेजारी चित्रनगरीकडे जाताना अपघात होतात. सरनोबतवाडी, शिवाजी विद्यापीठाकडे वळताना अपघात होतात. तावडे हॉटेलकडे वळताना व उचगावकडे जाताना अपघात होतात.