शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

धैर्यशील माने यांनी फुंकले लोकसभेसाठी रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:40 IST

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून २०१९ ला होणारी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे झेंड्याचा निर्णय योग्य वेळी : बहुजन समाजाची मोट बांधण्याचा निर्धार; शेतकरी संघटना राजकीय झाल्याचीही टीका सत्तेभोवतीचे राजकारण सामान्य माणसाने ओळखले आहे.शेतकºयांनी टाकलेल्या विश्वासास शेट्टी यांच्या भूमिकेने तडा गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघातून २०१९ ला होणारी लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. कोणत्या पक्षातून लढायचे हा निर्णय योग्य वेळी घेऊ. केवळ विरोधाला विरोध म्हणून नव्हे तर सर्व विचारांच्या लोकांना एकत्रित करीत बहुजन समाजाची मोट बांधणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्वर्गीय बाळासाहेब माने यांनी लोकसभेच्या पाच निवडणुका जिंकल्या. निवेदिता माने यांनीही पाचपैकी दोन निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे माने कुटुंबाला दीर्घ सामाजिक व राजकीय इतिहास आहे; पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने आमच्या हातातून मतदारसंघ काढून घेऊन तो कॉँग्रेसला दिल्याने थांबावे लागले. लढाई थांबली की कार्यकर्ता थांबतो; त्यामुळे गेले अनेक दिवस माने यांनी पन्हाळा-शाहूवाडीपासून शिरोळपर्यंतच्या माने गटाच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, माजी खासदार निवेदिता माने यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाबाबत ‘वेट अ‍ॅँड वॉच’ची भूमिका असून आज, गुरुवारपासूनच मतदारसंघातील वाड्यावस्त्या पिंजून काढण्यास सुरुवात करणार आहे. आमचे कार्यकर्ते सर्व पक्षांत विखुरलेले आहेत. त्यांना सोबत घेऊन गटाची पुनर्बांधणी करावी लागणार असल्याचे माने यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका करताना माने म्हणाले, केंद्र व राज्यात भाजपला सोडचिठ्ठी दिली; पण जिल्हा परिषदेतील प्रेम मात्र कायम आहे. गेल्या वेळेलाही केंद्र व राज्यात कॉँग्रेसविरोधात पण जिल्हा परिषदेत त्यांच्यासोबत सत्तेत राहिले. त्यांचे सत्तेभोवतीचे राजकारण सामान्य माणसाने ओळखले आहे. संघटनेतून शेतकरी बाजूला पडला असून शेतकरी संघटना ‘राजकीय’ झाल्याची टीका माने यांनी केली.माने गट अद्याप राष्टÑवादीतचअद्याप आम्ही राष्टÑवादी सोडलेली नाही. पक्षाचा अक्रियाशील सदस्य असून वहिनीसाहेब मात्र क्रियाशील आहेत; पण पक्षाने आमचे प्ले-ग्राउंडच काढून घेतले. कॉँग्रेसला मतदारसंघ दिल्याने आम्हाला सावध भूमिका घ्यावी लागत आहे. संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे, आतापर्यंत आम्ही लढा उभा केला म्हणूनच तरल्याचे माने यांनी सांगितले. 

शेट्टी बहुजन समाजाविरोधातराजू शेट्टी यांचे राजकारण हे बहुजन समाजाविरोधात असल्याचा कदाचित कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अनुभव आला असेल. प्रश्न संपला की शेट्टींचे राजकारण संपले; त्यामुळे ते प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन करतात, हे आता लोकांच्या लक्षात आले असून शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, बारा बुलतेदारांसह बहुजन समाजाला बरोबर घेऊन आपण लढाई करणार असल्याचे माने यांनी सांगितले.भाऊंच्या पक्षविरहित संघटनेला पाठिंबाबहुजन समाजातील म्हणून सदाभाऊंचे खच्चीकरण करण्याचे काम राजू शेट्टी यांनी केले. त्यामुळे खोत यांनी यापूर्वीच हा निर्णय घेणे गरजेचे होते. शेतकºयांनी टाकलेल्या विश्वासास शेट्टी यांच्या भूमिकेने तडा गेला आहे. सदाभाऊंनी पक्षविरहित संघटना काढली तर तिला आमचा पाठिंंबा राहणार असून, शेतकºयांच्या प्रश्नांचा कोणा एकट्याला मक्ता दिला नसल्याचा टोलाही माने यांनी लगावला.संभाजीराजे माझे मार्गदर्शकखासदार संभाजीराजे यांच्याशी आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमची वाटचाल सुरू असून, त्यांचा आशीर्वाद घेऊन पाऊल टाकणार असल्याचे माने यांनी सांगितले.