शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अडविण्याच्या बंधाऱ्यावरून अवजड वाहनांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST

सदाशिव मोरे । आजरा आजरा तालुक्यात हिरण्यकेशी व चित्री नदीवर १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ५० वर्षांपूर्वी बांधले आहेत. १५ ...

सदाशिव मोरे । आजरा

आजरा तालुक्यात हिरण्यकेशी व चित्री नदीवर १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ५० वर्षांपूर्वी बांधले आहेत. १५ पैकी १२ बंधाऱ्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. बंधाऱ्यांचे बांधकाम कमकुवत झाले असून, प्रतिवर्षी अनेक बंधाऱ्यांचे पिलर कोसळत आहेत. पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्यांवरून अवजड वाहनांची धोकादायक सुरू असलेली वाहतूक थांबविण्याची गरज आहे. आजरा तालुक्यात सरासरी १५० मि.मी. पाऊस पडतो. पावसाळ्यात नेहमी हिरण्यकेशी व चित्री नदी धोक्याच्या पातळीबाहेरून वाहत असतात. अतिवृष्टीच्या काळात नदीच्या पाण्याचा वेग जास्त असतो, तर बंधाऱ्यांना मोठ्या ओंडक्यांसह झुडपेही येऊन अडकत असतात. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होतो. अतिवृष्टीच्या काळात आठ-आठ दिवस सर्वच बंधारे पाण्याखाली असतात. बंधाऱ्यांवरून वाळू, वीट, सिमेंट, ऊस, लाकूड यासह अवजड वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. बंधाऱ्यांवर पडलेले खड्डेही बुजविले जात नाहीत. हिरण्यकेशी नदीवर पाटबंधारे विभागाने साळगाव, देवर्डे, दाभील, सुळेरान, ऐनापूर, भादवण, हाजगोळी, चांदेवाडी, गजरगाव याठिकाणी, तर चित्री नदीवर परोली येथे बंधारे बांधले आहेत. स्थानिक स्तर जलसंधारण विभागाने किटवडे, शेळप, सोहाळे याठिकाणी बंधारे बांधले आहेत. यापैकी चांदेवाडी, सुळेरान व सोहाळे या बंधाऱ्यावरून फक्त नागरिकांची ये-जा सुरू आहे, तर अन्य सर्व बंधाऱ्यांवरून धोकादायकपणे वाहनांची वाहतूक सुरू आहे.

-

* बंधाऱ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची गरज

बंधाऱ्यावरील अवजड वाहतुकीमुळे पिलर कमकुवत झाले आहेत, तर बंधाऱ्यावर पडलेले खड्डेही भविष्यात धोका निर्माण करू शकतात. ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांचे मजबुती व क्षमता तपासणे, स्ट्रक्चरल आडिट होणे गरजेचे आहे. --------------------------------

* साळगावचा पिलर कोसळला, तर हाजगोळी बंधाऱ्यावर खड्डा

चालू वर्षी साळगाव बंधाऱ्याचा एका पिलरचा भाग कोसळला आहे, तर हाजगोळी बंधाऱ्यावर मधोमध मोठा खड्डा पडला आहे. यामुळे या दोन्हीही बंधाऱ्यांना धोका आहे. पाणी कमी झाल्याशिवाय या दोन्ही बंधाऱ्यांची दुरुस्ती होऊ शकत नाही; पण तत्पूर्वी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. -----------------------------------

* साळगाव बंधाऱ्याशेजारील पर्यायी पुलाचे भिजत घोंगडे

साळगाव बंधाऱ्यावर पावसाळ्यात आठ-आठ दिवस पाणी असते. नागरिकांना सोहाळे मार्गे जावे लागते. बंधाऱ्याशेजारील पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला. भूमिपूजनही झाले; पण बांधकामापूर्वीच आलेला निधीही परत गेल्यामुळे पर्यायी पूल कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ------------------------------

* फोटो ओळी : हिरण्यकेशी नदीवरील दाभील बंधारा.

क्रमांक : ०१०२२०२१-गड-०३