शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

पाणी चोरीसाठी टॅ्रक्टरमधून मोटारींची वाहतूक

By admin | Updated: September 6, 2015 20:38 IST

कोरेगाव तालुका : वीजतारांवर आकडे टाकून प्रताप; दुष्काळात नांदवळ धरणातून पाण्याचा उपसा

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी एकमेव वरदान असलेल्या नांदवळ धरणातून अवैध पाण्याचा उपसा केला जात आहे. अनेक धनिक शेतकरी महावितरण व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताला धरून आकडे टाकून या धरणातून पाणीउपसा करत आहेत. यामुळे या भागातील अनेक गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. दरम्यान, विशेषत: करून रात्रीच्या सुमारास दुचाकी, ट्रॅक्टरमधून विद्युत मोटारी आणून पाणीउपसा होत आहे. सकाळी पुन्हा या मोटारी माघारी नेण्यात येत आहेत. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी प्रारंभी अत्यल्प पाऊस झाला. त्यानंतर मात्र आजपर्यंत पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचा सामना या भागाला मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. या भागातील अनेक गावांत पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तर या भागाला वरदान असलेली नांदवळ, तळहिरा, अरबवाडी, गुजरवाडी, भाडळे ही धरणे आता कोरडी पडू लागली आहेत. एका बाजूने असा पाणीप्रश्न बिकट होत असताना नांदवळमधील धरणात असलेल्या मृत पाणीसाठाही काही धनिक शेतकरी बांधकाम विभाग कर्मचारी व महावितरणला हाताशी धरून रात्रीच्या वेळी आकडे टाकून त्या पाण्याची चोरी करत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या चार-पाच वर्षांत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. सध्या असणाऱ्या पाणीसाठ्यावरच या भागातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. या धरणात असलेल्या पाणीसाठ्याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. या धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना या धरणातील पाणीउपसा करण्याचा परवाना असला तरी सध्याची परस्थिती पाहता या सर्वांवरच कडक भूमिका अवलंबण्याची गरज आहे. (वार्ताहर) धरणातून रात्रीच्यावेळी पाण्याची चोरी होत आहे. दुचाकी व ट्रॅक्टरसारख्या वाहनांचा वापर विद्युत मोटारी आणण्यासाठी केला जात आहे. पाच पासून वीस अश्वशक्तीपर्यंतच्या मोटारी सुरू असतात. याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. - प्रमोद पवार, शेतकरी, नांदवळनांदवळ धरणात सध्यातरी पाणीचोरीची कोणतीही घटना घडत नाही. याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही विद्युत मोटारी पाणी उपसा करताना सापडल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करू- रामचंद्र खरात, पाटकरी, निरा उजवा कालवाचौकशी करण्याची मागणी...एका बाजूने या नांदवळ धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. उपसा करणाऱ्या धनिकांकडे एवढ्या मोठ्या क्षमतेच्या विद्युत पंपाची परवानगी व अधिकृत विजेची व्यवस्था आहे का? याबाबत जिल्हा स्तरावरूनच तपासणी होण्याची गरज आहे. तसेच रात्रीच्या सुमारास या धरणाची पाहणी केल्यास अनेक मोटारी सुरू असल्याचे दिसून येईल, अशी मागणी नांदवळ ग्रामस्थांनी केली आहे.