शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

पाणी चोरीसाठी टॅ्रक्टरमधून मोटारींची वाहतूक

By admin | Updated: September 6, 2015 20:38 IST

कोरेगाव तालुका : वीजतारांवर आकडे टाकून प्रताप; दुष्काळात नांदवळ धरणातून पाण्याचा उपसा

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी एकमेव वरदान असलेल्या नांदवळ धरणातून अवैध पाण्याचा उपसा केला जात आहे. अनेक धनिक शेतकरी महावितरण व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताला धरून आकडे टाकून या धरणातून पाणीउपसा करत आहेत. यामुळे या भागातील अनेक गावांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. दरम्यान, विशेषत: करून रात्रीच्या सुमारास दुचाकी, ट्रॅक्टरमधून विद्युत मोटारी आणून पाणीउपसा होत आहे. सकाळी पुन्हा या मोटारी माघारी नेण्यात येत आहेत. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात यावर्षी प्रारंभी अत्यल्प पाऊस झाला. त्यानंतर मात्र आजपर्यंत पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचा सामना या भागाला मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. या भागातील अनेक गावांत पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तर या भागाला वरदान असलेली नांदवळ, तळहिरा, अरबवाडी, गुजरवाडी, भाडळे ही धरणे आता कोरडी पडू लागली आहेत. एका बाजूने असा पाणीप्रश्न बिकट होत असताना नांदवळमधील धरणात असलेल्या मृत पाणीसाठाही काही धनिक शेतकरी बांधकाम विभाग कर्मचारी व महावितरणला हाताशी धरून रात्रीच्या वेळी आकडे टाकून त्या पाण्याची चोरी करत आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या चार-पाच वर्षांत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील धरणात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. सध्या असणाऱ्या पाणीसाठ्यावरच या भागातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. या धरणात असलेल्या पाणीसाठ्याबाबत लक्ष देण्याची गरज आहे. या धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना या धरणातील पाणीउपसा करण्याचा परवाना असला तरी सध्याची परस्थिती पाहता या सर्वांवरच कडक भूमिका अवलंबण्याची गरज आहे. (वार्ताहर) धरणातून रात्रीच्यावेळी पाण्याची चोरी होत आहे. दुचाकी व ट्रॅक्टरसारख्या वाहनांचा वापर विद्युत मोटारी आणण्यासाठी केला जात आहे. पाच पासून वीस अश्वशक्तीपर्यंतच्या मोटारी सुरू असतात. याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. - प्रमोद पवार, शेतकरी, नांदवळनांदवळ धरणात सध्यातरी पाणीचोरीची कोणतीही घटना घडत नाही. याबाबत वेळोवेळी सूचना देऊनही विद्युत मोटारी पाणी उपसा करताना सापडल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करू- रामचंद्र खरात, पाटकरी, निरा उजवा कालवाचौकशी करण्याची मागणी...एका बाजूने या नांदवळ धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. उपसा करणाऱ्या धनिकांकडे एवढ्या मोठ्या क्षमतेच्या विद्युत पंपाची परवानगी व अधिकृत विजेची व्यवस्था आहे का? याबाबत जिल्हा स्तरावरूनच तपासणी होण्याची गरज आहे. तसेच रात्रीच्या सुमारास या धरणाची पाहणी केल्यास अनेक मोटारी सुरू असल्याचे दिसून येईल, अशी मागणी नांदवळ ग्रामस्थांनी केली आहे.