शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

पूरग्रस्तांना मदतवाटपाचे पारदर्शी आरे मॉडेल --(ऑन द स्पॉट रिपोर्ट )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:30 IST

आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे.

विश्र्वास पाटील -कोल्हापूर : आरे (ता. करवीर) येथे महापुरात नुकसान झालेल्या लोकांना अत्यंत सुत्रबध्दरित्या मदतीचे वाटप सुरु आहे. त्या गावांत मदत घेवून जाणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून त्याबध्दल कौतुक व्यक्त होत आहे. पूरग्रस्त अनेक गावांमध्ये आलेल्या मदतीवरून मारामाºया सुरु झाल्या आहेत. मदतीची पळवापळवी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर या गावाचे वेगळेपण उठून दिसणारे आहे. धान्य स्वरुपातील मदत आता पाठवू नये असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

आरे हे सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गांव तुळशी व भोगावती नदीच्या काठावर वसले आहे. कोल्हापूरपासून पश्चिमेला २२ किलोमीटरवर हे गाव येते. गावांला वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक टायर ट्रॅक्टर व बुलडोझर असणारे हे गांव आहे. एकूण शेतीखालील जमिन आणि लोकसंख्या याचा विचार करता दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही गाव जिल्ह्यांत पहिल्या पाचमध्ये येईल इतके हे समृध्द गांव परंतू महापुराने मोठे नुकसान केले. महापुरात गावाचे शंभर टक्के स्थलांतर नवीन वसाहतीत झाले. आता या संकटानंतर गावाच्या मदतीला साºया महाराष्ट्रातून मदत येवू लागली आहे.

मदतवाटप समन्वय समितीगावासाठी येणारी सर्व मदत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आनंदराव खराडे यांच्या घरांत एकत्रित केली जात आहे. ज्यांना थेट ग्रामस्थांना मदत द्यायची आहे, ते जावून लोकांना मदत देवू शकतात. त्यांना पूरक सहकार्य ग्रामस्थ करत आहेत. मदतवाटप कामाचा समन्वय करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये सरपंच साक्षी कुंभार, उपसरपंच अमर वरुटे, महेश वरुटे, जयदिप मोहिते, विश्र्वास वरुटे, निवास मोहिते, एकनाथ गुरव, बबन चौगुले, पोलिस पाटील विनायक लोहार, तलाठी नरेंद्र झुंबड व ग्रामसेवक दीपा यादव यांचा समावेश आहे.  

मदत वाटप सुत्र ---गावची लोकसंख्या २८५४. पूरबाधित कुटुंबे : २९० :  पूरग्रस्त लोकसंख्या : १४८६. पडलेली घरे : ३२समितीने तातडीने घर टू घर जावून सर्व्हे करून पूरग्रस्तांची संख्या निश्चित केली. त्यानुसार प्रत्येकी ५ किलो तांदूळ, गहू, आट्टा, एक किलो खाद्यतेल, प्रत्येकी १ किलो कांदा व बटाटे, मिनरल वॉटर कुटुंबासाठी रोज ५ लिटर आणि एका कुटुंबासाठी १ किलो चटणी असे सुत्र निश्चित केले.मदत वाटली कशी..आलेल्या मदतीची पॅकेट तयार होती. मदत वाटपाचे रजिस्टर घालून प्रत्येक कुटुंबास रोज एक टोकन दिले जाते. रजिस्टरवर कुटुंब प्रमुखाची सही घेतली जाते. त्यानंतर ते टोकून जमा केल्यानंतर प्रत्यक्ष मदत मिळते. रोज सकाळी १० ते १ पर्यंत हे काम गावांतील तरुण कार्यकर्त्याच्या सहकार्याने चालते. त्याची आदल्यादिवशी गावांत दवंडी दिली जाते.काय साधले..सुत्रबध्दपणे मदत वाटप सुरु असल्याने पूरग्रस्त लोकांना त्याचे अत्यंत पारदर्शीपणाने वाटप झाले. मला मदत मिळाली नाही किंवा कुणाला जास्त मिळाली याबद्दल कुणाचीही एकही तक्रार नाही. सर्व राजकीय गट एकत्र येवून गावाचे काम म्हणून या गोष्टीकडे पाहिल्याने कुठेच अडचण आली नाही.मदत केली कुणी..औरंगाबादहून संभाजी ब्रिगेड : २ ट्रक धान्यपुण्यातून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई : १ ट्रक धान्य व ब्लँकेटतूळजापूर देवस्थान : १ ट्रक धान्य व कपडेचर्मकार सेवा संस्था कणकवली : धान्यशिवसाम्राज्य फाऊंडेशन फोंडाघाट : धान्य व औषधेपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती : १ ट्रक धान्यभोसरीचे आमदार महेश लांडगे : धान्य १ ट्रक व एक ट्रक कडबाकुट्टी पृथ्वी एंटरप्रायजेस पूईखडी (कोल्हापूर) : ४० कुटुंबांना भांडी सेटअर्थमुव्हर्स असोसिएशन : पशुखाद्यपंख फाऊंडेशन कोल्हापूर : कपडे व खाद्यतेलआरोग्य तपासणी : अ‍ॅस्टर आधार, सावली केअर सेंटर, कणेरी मठ रुग्णालयदापोली व बेले ग्रामस्थ : घरांची पडझड झालेल्या ३२ कुटुंबाना दापोली (जि.रत्नागिरी) ग्रामस्थांकडून प्रत्येकी ४ हजारांची व बेले (ता. करवीर) ग्रामस्थांकडून प्रत्येकी १ हजारांची रोख मदत(याशिवाय छोट्यामोठ्या  विविध १५० संस्थांकडून विविध प्रकारची मदत)

  • मेस्त्री धावून आले.

बीडशेड (ता. करवीर) ९ मेस्त्री महापूर उतरल्यावर एकादिवशी आपापले साहित्य घेवून आले व त्यांनी दिवसांत १८० मोटारसायकली मोफत दुरुस्त करून दिल्या.

  • दिवसांत वीजपुरवठा..

गावांतील ज्या घरांतील वीज पुरवठा खंडित झाला होता अशा सर्व घरांमध्ये चार वायरमननी दिवसभर राबून वीजपुरवठा दुरुस्त करून दिला.

  • थेट जेवणाची मदत

महापुराच्या काळात व पूर ओसरल्यानंतरही बाचणी, कारभारवाडी, सडोली खालसा, सावरवाडी, म्हाळुंगे, बेले, येळवडे, सोनाळी, हसूर, कोथळी ही गांवे अक्षरक्ष: धावून आली. त्यांनी जेवून करून आणून पूरग्रस्तांना वाढले. माहेरवाशिणींना दुरड्या भरून शिदोरी देतात तसे या गावांतून महिलांनी जेवण पोहोच केले.

  • मदत काय काय मिळाली

तांदूळ, आटा,खाद्यतेल, चटणी,कपडे, साड्या ड्रेस, ब्लँकेट, बेडशीट, चादरी, टॉवेल, भांडी सेट,टूथब्रश, शालेय साहित्य आणि पिण्याचे पाणी

आरे गावांचे मला दोन गोष्टीसाठी कौतुक वाटते. त्यांनी ज्यापध्दतीने महापुरात तातडीने लोकांचे व जनावरांचे स्थलांतर केले ते जास्त महत्वाचे होते. त्यामुळे जिवितहाणी झाली नाही. मदत वाटपाची पध्दतही अत्यंत छान असून त्यामध्ये समानता आहे. हे अन्य गावांनी आपत्तीव्यवस्थापन व मदत कार्याचे मॉडेल म्हणून वापरता येण्यासारखे आहे.डॉ. किमया शहाविश्वस्त, लोटस मेडिकल फाऊंडेशन कोल्हापूर 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर