यावेळी बोलताना तलाठी सुवर्णा भोईर म्हणाल्या, शासनाच्या वतीने सुरू असलेल्या शेती पिकांची मोबाईलद्वारे होणारी ई-पीक नोंदणी महत्त्वाची आहे. डिजिटल इंडियाद्वारे शेतीचे तंत्रज्ञान बदलले आहे ई पीकनिहाय नोंदणीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.
प्रारंभी मार्गदर्शन करताना माजी सैनिक व कोतवाल सुरेश दिंडे म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश असून, कृषि क्षेत्रात नवनवीन बदल येत आहेत. त्याचा नव्या पिढीने उपयोग केला पाहिजे. ई पीक नोंदणी ही काळाची गरज आहे. ई पीक पीकनिहाय नोंदणीचे तंत्रज्ञान अवगत होणे गरजेचे आहे. यावेळी मुख्याध्यापक गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी एकनाथ चौगले यांनी प्रास्ताविक केले. एस. के. पाटील यांनी आभार मानले.