शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

म्हशी, रेडकांना स्पर्धेसाठी सहा महिने अगोदर ट्रेनिंग, डायट प्लॅनही

By सचिन यादव | Updated: January 11, 2025 16:40 IST

सचिन यादव कोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच ...

सचिन यादवकोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच अनेक मैदानी, मर्दानी खेळ जोपासले. त्याकाळी म्हशींच्या शर्यती हा प्रकार जन्माला आला. तो आजतागायत सुरू आहे. दिवाळी पाडव्यापासून सुरू होत असलेल्या स्पर्धा मे महिन्यापर्यंत घेतल्या जातात. त्याची तयारी सहा महिने आधी केली जात असून, लाखांची बक्षिसे स्पर्धेसाठी आहेत. जिल्ह्यातील हजारांहून अधिक म्हैस मालक यामध्ये सहभागी होतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत या स्पर्धा लोकप्रिय ठरल्या आहेत.स्पर्धेत रेडकू आणि म्हशी उतरविण्यासाठी सहा महिने आधी तयारी केली जाते. उच्चतम, मध्यम आणि सर्वसामान्य अशी तीन गटांत स्पर्धेचे वर्गीकरण केले जाते. सहा महिने ते सुमारे तीन वर्षे वय असलेले रेडूक आणि म्हैशी स्पर्धेत सहभाग घेतात. रेडकूसाठी एक किलोमीटर आणि म्हशीसाठी दोन किलोमीटर अंतराच्या स्पर्धा घेतल्या जातात. बाइकच्या पाठीमागून म्हशी पळविण्याचा थराराने आणि एकमेकांना ओव्हरटेक करणाऱ्या म्हशी आणि बाइकचे ब्रेक थांबल्यावर जागेवर थांबून झपकन वळणाऱ्या म्हशींची थरारक कसरत पाहण्यासारखी असते.रोज त्यांना ट्रॅकवर चालविणे, पाण्यात पोहणे, लाल कापड समोर धरून दुचाकीच्या मागे धावणे, मालकाच्या आवाजाची सवय केली जाते. त्यासह त्यांचा रोजचा `डाएट प्लॅन`ही ठरलेला आहे. दर्जेदार खुराक, रोज तीन ते सहा लिटर दूध, पेंड, भुसासह त्यांची आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. स्पर्धेच्या पूर्वी त्यांना योग्य तो आरामही दिला जातो. तीन हाकेत म्हैस बोलविण्यासाठी मालकाला खूप सराव करावा लागतो. खुर्चीवर उभे राहून अनेकदा पहिल्या हाकेतच म्हैस मालकाजवळ पोहोचते, हे एक वेगळेच कौशल्य असते.

स्पर्धेची व्याप्ती सध्या वाढली असून, टेम्पोमधून म्हशी नेल्या जाऊ लागल्या आहेत. म्हशींच्या शर्यतीमुळे महाराष्ट्रात कोल्हापूरची एक वेगळी ओळख तयार झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात या स्पर्धा होत असून, दोन लाखांपर्यंतची बक्षिसे संयोजकांकडून दिली जात आहेत.

अनेक कुटुंबांचा भागराजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या काळात कणेरी मठ, उजळाईवाडी येथे मोठे गोठे होते. दिवस-रात्र केले जाणारे वैरणपाणी, सततचा सहवास यामुळे जनावरांनासुद्धा माणसांचा लळा लागतो. अनेक कुटुंबांचाच हा एक भाग बनला आहे.

स्पर्धेच्या प्रकारात बदलकाळानुरूप स्पर्धेच्या प्रकारात बदल झाला. त्या काळात एकदम सगळ्या म्हशी मालकांच्या पाठीमागे पळण्याची स्पर्धा होती. सर्वांत प्रथम येणारी म्हैस विजेती होत असे. याप्रमाणे क्रमांक ठरविले जात होते. त्यावेळी गवताच्या जाळावरून म्हैस उडी मारून पळविण्याचे, तसेच लपून म्हशीला बोलाविणे, दोन पायांवर बसणे, चौरंगावर बसणे असे कसरतीचे प्रयोग केले जायचे. सध्या दुचाकीमागून म्हैस पळविणे, दूर अंतरावरून तीन हाकेत म्हैस बोलाविणे, असे प्रकार रुजले. स्टॉप वॉचच्या साहाय्याने वेळ मोजून कमीत कमी वेळ हा क्रमांकासाठी निकष ठरविला.

माणूस आणि जनावरे यांच्यातील प्रेम वेगळे असते. परस्परांवर अवलंबून असलेले अवलंबित्व आणि गरज म्हणून जनावरे आणि मालकांचे ऋनानुबंध अधिक घट्ट होतात. दुचाकीच्या हॉर्नच्या इशाऱ्यावर कै. मनोहर पाटील यांनी सन १९५९ मध्ये म्हैस जवळ बोलावून दाखविली. त्यानंतर हा प्रकार जिल्ह्यात रूढ झाला. - राजू पाटील, बुधवार पेठ, संचालक कोल्हापूर जिल्हा म्हैस धारक असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूर