शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

म्हशी, रेडकांना स्पर्धेसाठी सहा महिने अगोदर ट्रेनिंग, डायट प्लॅनही

By सचिन यादव | Updated: January 11, 2025 16:40 IST

सचिन यादव कोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच ...

सचिन यादवकोल्हापूर : राजेशाही शौक कोल्हापुरातल्या रहिवाशांनी मनापासून जपले. हत्तीची साठमारी, कोंबड्याच्या झुंजी, रेड्यांच्या टकरा, म्हशींच्या शर्यती याबरोबरच अनेक मैदानी, मर्दानी खेळ जोपासले. त्याकाळी म्हशींच्या शर्यती हा प्रकार जन्माला आला. तो आजतागायत सुरू आहे. दिवाळी पाडव्यापासून सुरू होत असलेल्या स्पर्धा मे महिन्यापर्यंत घेतल्या जातात. त्याची तयारी सहा महिने आधी केली जात असून, लाखांची बक्षिसे स्पर्धेसाठी आहेत. जिल्ह्यातील हजारांहून अधिक म्हैस मालक यामध्ये सहभागी होतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत या स्पर्धा लोकप्रिय ठरल्या आहेत.स्पर्धेत रेडकू आणि म्हशी उतरविण्यासाठी सहा महिने आधी तयारी केली जाते. उच्चतम, मध्यम आणि सर्वसामान्य अशी तीन गटांत स्पर्धेचे वर्गीकरण केले जाते. सहा महिने ते सुमारे तीन वर्षे वय असलेले रेडूक आणि म्हैशी स्पर्धेत सहभाग घेतात. रेडकूसाठी एक किलोमीटर आणि म्हशीसाठी दोन किलोमीटर अंतराच्या स्पर्धा घेतल्या जातात. बाइकच्या पाठीमागून म्हशी पळविण्याचा थराराने आणि एकमेकांना ओव्हरटेक करणाऱ्या म्हशी आणि बाइकचे ब्रेक थांबल्यावर जागेवर थांबून झपकन वळणाऱ्या म्हशींची थरारक कसरत पाहण्यासारखी असते.रोज त्यांना ट्रॅकवर चालविणे, पाण्यात पोहणे, लाल कापड समोर धरून दुचाकीच्या मागे धावणे, मालकाच्या आवाजाची सवय केली जाते. त्यासह त्यांचा रोजचा `डाएट प्लॅन`ही ठरलेला आहे. दर्जेदार खुराक, रोज तीन ते सहा लिटर दूध, पेंड, भुसासह त्यांची आठवड्यातून एकदा आरोग्य तपासणी केली जाते. स्पर्धेच्या पूर्वी त्यांना योग्य तो आरामही दिला जातो. तीन हाकेत म्हैस बोलविण्यासाठी मालकाला खूप सराव करावा लागतो. खुर्चीवर उभे राहून अनेकदा पहिल्या हाकेतच म्हैस मालकाजवळ पोहोचते, हे एक वेगळेच कौशल्य असते.

स्पर्धेची व्याप्ती सध्या वाढली असून, टेम्पोमधून म्हशी नेल्या जाऊ लागल्या आहेत. म्हशींच्या शर्यतीमुळे महाराष्ट्रात कोल्हापूरची एक वेगळी ओळख तयार झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात या स्पर्धा होत असून, दोन लाखांपर्यंतची बक्षिसे संयोजकांकडून दिली जात आहेत.

अनेक कुटुंबांचा भागराजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या काळात कणेरी मठ, उजळाईवाडी येथे मोठे गोठे होते. दिवस-रात्र केले जाणारे वैरणपाणी, सततचा सहवास यामुळे जनावरांनासुद्धा माणसांचा लळा लागतो. अनेक कुटुंबांचाच हा एक भाग बनला आहे.

स्पर्धेच्या प्रकारात बदलकाळानुरूप स्पर्धेच्या प्रकारात बदल झाला. त्या काळात एकदम सगळ्या म्हशी मालकांच्या पाठीमागे पळण्याची स्पर्धा होती. सर्वांत प्रथम येणारी म्हैस विजेती होत असे. याप्रमाणे क्रमांक ठरविले जात होते. त्यावेळी गवताच्या जाळावरून म्हैस उडी मारून पळविण्याचे, तसेच लपून म्हशीला बोलाविणे, दोन पायांवर बसणे, चौरंगावर बसणे असे कसरतीचे प्रयोग केले जायचे. सध्या दुचाकीमागून म्हैस पळविणे, दूर अंतरावरून तीन हाकेत म्हैस बोलाविणे, असे प्रकार रुजले. स्टॉप वॉचच्या साहाय्याने वेळ मोजून कमीत कमी वेळ हा क्रमांकासाठी निकष ठरविला.

माणूस आणि जनावरे यांच्यातील प्रेम वेगळे असते. परस्परांवर अवलंबून असलेले अवलंबित्व आणि गरज म्हणून जनावरे आणि मालकांचे ऋनानुबंध अधिक घट्ट होतात. दुचाकीच्या हॉर्नच्या इशाऱ्यावर कै. मनोहर पाटील यांनी सन १९५९ मध्ये म्हैस जवळ बोलावून दाखविली. त्यानंतर हा प्रकार जिल्ह्यात रूढ झाला. - राजू पाटील, बुधवार पेठ, संचालक कोल्हापूर जिल्हा म्हैस धारक असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूर