शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरीत ‘ट्रॅफिक’चा फलक हटविला

By admin | Updated: April 6, 2015 01:13 IST

कृती समिती आक्रमक : ९ नंबर शाळेचे पटांगण शहर वाहतूकच्या कार्यालयास न देण्यावर ठाम; आजचा कार्यक्रम उधळणार

कोल्हापूर : राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ येथे शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरास शाळा व मैदान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विरोधाचा जोर वाढविला असून रविवारी सकाळी शाळेच्या इमारतीवर ‘शहर पोलीस वाहतूक शाखा’ असा लावलेला फलक कार्यकर्त्यांनी हटविला. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज, सोमवारी सकाळी कार्यालयाचा नियोजित उद्घाटन समारंभ हाणून पाडण्याचा निर्धार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. शाळा क्रमांक ९ ही गेली काही वर्षे बंद आहे. शाळेच्या दहा खोल्या व मोठे मैदान पडूनच आहे. त्याचा वापर परिसरातील दुकाने व व्यावसायिकांकडून पार्किंगसाठी केला जातो. मैदानाचीही मोठी पडझड झाली आहे. शाळेच्या तीन खोल्या ‘ट्रॅफिक पोलीस’ वापरणार आहेत. पडझड झालेल्या खोल्यांची पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्ती केली आहे. शनिवारी सायंकाळी शाळेचे नाव असलेल्या जागी शहर वाहतूक शाखेचा फलक लावला. तो फलक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खोडून काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. आंदोलनात नगरसेवक मुरलीधर जाधव, वसंत कोगेकर, बाबा इंदुलकर, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, आदी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले. जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळणारे पाणी रोखण्यासाठी जयंती पुलावर ४५० अश्वशक्तीच्या पाणी उपसा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या उपसा केंद्रातून पाणी कसबा बावडा येथील प्रक्रिया केंद्रात नेण्यात येणार आहे. जयंती नाल्यावर विजेची उपकरणे, जनरेटर मीटर रूम, पॅनल रूम, ११ के.व्ही. क्षमतेच्या उच्चदाब विद्युत सबस्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या जयंती नाल्याशेजारी असणारी सर्व जागा महापालिक ा वापरात आणणार आहे. त्यामुळे महापालिकेने ‘ट्रॅफिक’साठी राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ येथील जागा प्रस्तावित केली आहे. नागरिकांच्या विरोधामुळे वाहतूक शाखेचे कार्यालय हलविण्यास विलंब झाल्यास एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास तितकाच कालावधी पुढे जाणार असल्याचे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)