शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जयसिंगपुरात चार पोलिसांवर वाहतुकीचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:52 IST

संदीप बावचे जयसिंगपूर: शहरातील बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. क्रांती चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी ...

संदीप बावचे

जयसिंगपूर: शहरातील बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. क्रांती चौकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी नियोजन करण्यात आले. चार वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला आता शिस्त लागणार आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गावर वसलेल्या जयसिंगपूर शहरात बाजारपेठ असल्याने आसपासच्या गावातील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी येतात. शिवाय बसस्थानकावरून ये-जा करणाऱ्या बसेसची संख्यादेखील जास्त आहे. अवजड वाहनांना शहरातून बंदी असतानादेखील सांगली, कोल्हापूरकडे जाणारी अशी वाहने बिनदिक्कतपणे जात आहेत. त्यामुळे क्रांती चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब बनली आहे.

क्रांती चौकातील कोंडीवर अनेकवेळा प्रयोग झाले आहेत. शिवाय, चारही दिशेला बॅरिकेड्स लावून ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वेगाला आळा घालण्यात आला होता. ही मोहीम काही काळच चालली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यामुळे पुन्हा वाहनांची गर्दी वाढली आहे.

नो-एंट्रीतून अनेक वाहने सुसाटपणे जात आहेत. क्रांती चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने एकऐवजी आता चार जणांची वाहतूक पोलीस म्हणून नियुक्ती केली आहे. उदगाव टोलनाक्याबरोबरच क्रांती चौकातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन केले आहे.

वाहनांवर दंडात्मक कारवाई

क्रांती चौकात बेशिस्तपणे अनेक वाहने उभी केली जातात. अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शिवाय वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. उदगाव व तमदलगे येथे अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीचे फलक लावण्यात येणार आहेत.

कोट - क्रांती चौकातील वाहतूक कोंडीबरोबरच अन्य ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जादा वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे. ही मोहीम व्यापकपणे राबविली जाईल.

- राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक

फोटो - ०१०९२०२१-जेएवाय-०७

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे.