शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या बंदने दीड कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 5, 2016 00:03 IST

नियमनमुक्तीला विरोध : फळांसह कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; बाजार समितीत शुकशुकाट

कोल्हापूर : फळे व भाजीपाला नियमनमुक्ती विरोधात सोमवारी अडते, व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहिले. यामध्ये भाजीपाला, फळांसह कांदा-बटाटा व्यापारी सहभागी झाल्याने समितीमधील सुमारे दीड कोटींची उलाढाल ठप्प झाली. राज्य सरकारने भाजीपाला व फळे नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समित्यांच्या बाहेर शेतकऱ्यांना आपला माल विकता येणार असल्याने याविरोधात व्यापारी व अडते आक्रमक झाले आहेत. माथाडी कामगारांनी सोमवारी ‘काम बंद’ आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. व्यापारी व अडते यांनी कामकाज बंद ठेवले तर बाजार समिती संघानेही या संपात उडी घेतल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिवसाला साधारणत: दीड कोटींची उलाढाल होते. फळे, भाजीपाला मार्केट सह कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनीही संपात सहभागी झाल्याने समिती परिसरात शुकशुकाट दिसत होता. नियमनातून फळे, भाजीपाला वगळण्याचा निर्णय अन्यायीहमाल पंचायत : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनकोल्हापूर : हमाल, मापाडी यांचा विचार न करता, शासनाने बाजार समितीमधील नियमनातून फळे व भाजीपाला आदी शेतीमाल वगळला आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतने ‘काम बंद’ ठेवून निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना याचे निवेदन देण्यात आले.उपाध्यक्ष आण्णाप्पा रामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दीडशेहून अधिक जणांच्या व्यापक शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.शासनाने हा निर्णय घेताना हमालांना विश्वासात घेतलेले नाही. शेतकरी ते ग्राहकांची भेट घडविण्याचा शासनाचा इरादा दिशाभूल करणारा आहे. त्यात शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. बाजार समितीमधील माल न आणता खुल्या बाजारात माल विक्री ही बाब वाटते तितकी सोपी नाही. बाजार समितीचे परवानाधारक हमाल, महिला, कष्टकरी कामगार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने विचार आणि कृती करतो. आमच्या भविष्याचा विचार न करता शासनाने अन्यायी धोरण स्वीकारले आहे. हे तत्काळ मागे घ्यावे. शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळवून देण्याची जबाबदारी ही शेतीमाल बाजार समितीने घेतली पाहिजे. शेतीमालाचा हमीभावाने खाली लिलाव जाणार नाही. याची दक्षता घेऊन प्रसंगी हमी फंडातून शेतकऱ्याला आर्थिक हमी दिली पाहिजे. शेतीमाल बाजार समित्यांमध्ये हमी फंडाची उभारणी व्हायला हवी. शिष्टमंडळात सरदार रोहिले, कृष्णात चौगले, गणपती पाटील, संभाजी खांडेकर, गोरख लेंडवे, विनोद बोरे, बापू आडूळकर, रूद्राप्पा तेली, शिवपुत्र शिरजगी आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)