शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देशात भगव्या भांडवलशाहीचा विषारी प्रयोग

By admin | Updated: February 29, 2016 00:53 IST

अभिजित वैद्यांचा आरोप : धर्मांधता लोकशाहीला आव्हान ठरत असल्याचा परिसंवादात सूर

कोल्हापूर : देशात सध्या भगव्या भांडवलीशाहीचा विषारी प्रयोग सुरू आहे, असा गंभीर आरोप राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी रविवारी केला. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्र सेवा दलात कडव्या सैनिकांची फौज वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्र सेवा दलाच्या अमृतमहोत्सवी मेळाव्यात अध्यक्षपदावरून ‘धर्मांधतेचे धर्मनिरपेक्ष लोकशाहीला आव्हान’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा, किसान संघर्ष समितीचे नेते डॉ. सुनीलम उपस्थिती होती. सदर बझारमधील कोरगावकर हायस्कूलमध्ये हा मेळावा झाला. डॉ. वैद्य म्हणाले, हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी संघ परिवार सक्रिय आहे. मोदी जाणीवपूर्वक गोंधळाची परिस्थिती निर्माण करून देशाच्या एकतेला बाधा आणत आहेत. ते भांडवलदारांचे दलाल बनले आहेत. राम आणि हराम, राष्ट्रप्रेम व देशद्रोह हे सत्ताधारी ठरवीत आहेत. त्याविरोधात आता राष्ट्र सेवा दलानेही रस्त्यावर येऊन लढा उभारण्याची गरज आहे. पटेल म्हणाल्या, धर्मांधताच केवळ धर्मनिरपेक्षतेला आव्हान देत नाही. महाश्रीमंत, समतावादी विचार न पटलेले, राज्यघटना मान्य नसलेले असेही लोक धर्मनिरपेक्ष लोकशाहीवर घाला घालीत आहेत. सुराणा म्हणाले, ‘सनातन’ची विचारधारा हिंसेला प्रोत्साहन देणारी आहेत. याच विचारधारेतून डॉ. नरेंद्र दाभोलकर, प्रा. कलबुर्गी यांची हत्या झाली आहे. यावेळी प्राचार्य टी. एस. पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमास व्यंकाप्पा भोसले, बाबासाहेब नदाफ, राष्ट्र सेवा दलाचे राजा अवसक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अनंत आजगावकर, प्रा. विठ्ठल बन्ने, प्रा. किसनराव कुराडे, जे. बी. बारदेस्कर, सुरेश शिपूरकर, एम. एस. पाटोळे, आदी उपस्थित होते.दंगली पेटवा...धर्माचा वापर राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात आहे. सांगली, इचलकरंजी परिसरात दंगली पेटवा आणि दोन खासदार, चार आमदार निवडून आणा, असा प्रयोग यापूर्वी झाला आहे, असा थेट आरोप पटेल यांनी केला.