शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तीसाठी प्रयत्न

By admin | Updated: February 8, 2015 01:07 IST

चंद्रकांतदादा : सांगली फाटा-बसवान्ना खिंड रस्ता ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे सुप्रीम कंपनीला आदेश

शिरोली : सांगली फाटा ते बसवान्ना खिंड या २० कि. मी. रस्त्याचे चौपदरीकरण ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुप्रीम कंपनीला दिले. तसेच कोल्हापूर-सांगली रस्ता टोलमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्याबाबत अभ्यास सुरू आहे, असेही सूतोवाच मंत्री पाटील यांनी केले. ते शासकीय विश्रामगृहात झालेल्या रस्त्याच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर-सांगली रस्त्याचे गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. ३१ आॅक्टोबरला कामाची मुदतही संपली आहे. पण, अद्याप ४० टक्केच काम झाले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे कामास विलंब झाला आहे, पण सध्या काम गतीने सुरू असून, ३१ मार्च २०१५ पर्यंत शिरोली-सांगली फाटा ते बसवान्ना खिंड या २० कि.मी.चे काम कंपनीने तत्काळ पूर्ण करावे, तसेच बसवान्ना खिंड ते सांगली या मार्गावरील भूसंपादन पूर्ण झाल्यावर ३१ मे २०१५ पर्यंत बसवान्ना खिंड ते जयसिंगपूर आणि बसवान्ना खिंड ते सांगली असे दोन्हीकडील दुपदरीचे काम कंपनीने पूर्ण करावे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब भूसंपादनातील त्रूटी दूर करून रस्त्यासाठी जमिनी लवकर कंपनीला द्याव्यात, असेही मंत्री पाटील म्हणाले. हातकणंगले येथील उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली असून, उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासही कंपनीला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाची रक्कम २०८ कोटी इतकी असून, ही रक्कम फार मोठी नसून, रक्कम परत देण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास सुरू असून, त्यामुळे लवकरच काहीतरी पर्याय मिळेल. त्यामुळे ही रक्कम लोकांवर लादण्यापेक्षा कंपनीला परत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची १९६ कोटींची कामे पूर्ण झाल्यावर लगेचच टोल चालू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असेही मंत्री पाटील म्हणाले. बैठकीस आमदार सुजित मिणचेकर, ‘सुप्रीम’चे अशोक मोहिते, सागर जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एन. एम. वेदपाठक, ए. एस. डफळे उपस्थित होते.