शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तीसाठी प्रयत्न

By admin | Updated: February 8, 2015 01:07 IST

चंद्रकांतदादा : सांगली फाटा-बसवान्ना खिंड रस्ता ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे सुप्रीम कंपनीला आदेश

शिरोली : सांगली फाटा ते बसवान्ना खिंड या २० कि. मी. रस्त्याचे चौपदरीकरण ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुप्रीम कंपनीला दिले. तसेच कोल्हापूर-सांगली रस्ता टोलमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्याबाबत अभ्यास सुरू आहे, असेही सूतोवाच मंत्री पाटील यांनी केले. ते शासकीय विश्रामगृहात झालेल्या रस्त्याच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर-सांगली रस्त्याचे गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. ३१ आॅक्टोबरला कामाची मुदतही संपली आहे. पण, अद्याप ४० टक्केच काम झाले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे कामास विलंब झाला आहे, पण सध्या काम गतीने सुरू असून, ३१ मार्च २०१५ पर्यंत शिरोली-सांगली फाटा ते बसवान्ना खिंड या २० कि.मी.चे काम कंपनीने तत्काळ पूर्ण करावे, तसेच बसवान्ना खिंड ते सांगली या मार्गावरील भूसंपादन पूर्ण झाल्यावर ३१ मे २०१५ पर्यंत बसवान्ना खिंड ते जयसिंगपूर आणि बसवान्ना खिंड ते सांगली असे दोन्हीकडील दुपदरीचे काम कंपनीने पूर्ण करावे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब भूसंपादनातील त्रूटी दूर करून रस्त्यासाठी जमिनी लवकर कंपनीला द्याव्यात, असेही मंत्री पाटील म्हणाले. हातकणंगले येथील उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली असून, उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासही कंपनीला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाची रक्कम २०८ कोटी इतकी असून, ही रक्कम फार मोठी नसून, रक्कम परत देण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास सुरू असून, त्यामुळे लवकरच काहीतरी पर्याय मिळेल. त्यामुळे ही रक्कम लोकांवर लादण्यापेक्षा कंपनीला परत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची १९६ कोटींची कामे पूर्ण झाल्यावर लगेचच टोल चालू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असेही मंत्री पाटील म्हणाले. बैठकीस आमदार सुजित मिणचेकर, ‘सुप्रीम’चे अशोक मोहिते, सागर जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एन. एम. वेदपाठक, ए. एस. डफळे उपस्थित होते.