शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीने अनुभवली पर्यटकांची मांदियाळी

By admin | Updated: July 20, 2014 22:13 IST

सहा तास वाहतुकीचा खोळंबा : अपुरा पोलीस बंदोबस्त

आंबोली : आंबोलीने आज रविवारी रेकॉर्डब्रेक अशी लाखो पर्यटकांची मांदियाळी अनुभवली. मात्र, या पर्यटकांच्या गर्दीमुळे आंबोलीच्या सुमारे १४ किलोमीटर रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. या वाहतुकीच्या कोंडीमुळे आंबोलीतील वाहतूक सहा तास खोळंबलेलीच होती. यातच अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे दुपारच्या सुमारात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या कोल्हापूर येथील मद्यपी पर्यटकांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले.पावसामुळे जून महिन्यात सुरु होणारे पर्यटन पावसाच्या लांबलेल्या आगमनामुळे उशिरा सुरु झाले. परंतु, श्रावणासाठी काही दिवस उरलेले असतानाच आंबोली पर्यटकांनी फुललेली दिसून आली. रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत आंबोली पर्यटनाची पंढरी बनली होती. कोल्हापूर, गोवा, कर्नाटक, रत्नागिरी यासह जिल्ह्यातील पर्यटकांनीही आंबोलीतील धुक्यामध्ये पावसाच्या रिमझिम धारांमध्ये धबधब्याचे पाणी अंगावर घेत मौजमजेसाठी आंबोलीत गर्दी केली होती. सुमारे लाखभर पर्यटक रविवारच्या दिवसभरात आंबोलीतील मुख्य धबधब्यांसह छोट्या धबधब्यात आनंद लुटत होते. मुख्य धबधब्यावरील गर्दी पाहून बऱ्याचशा पर्यटकांनी कावळेसाद, नांगरतास आदी ठिकाणवरही जात आस्वाद घेतला.आंबोलीत रविवारी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडून गेली. येथील काही पर्यटकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्टॉलच्या समोरच गाड्या उभ्या केल्या होत्या. त्यानंतर वाहनांची गर्दी वाढत गेली. आणि वाहनांचा झालेला गोतावळा सोडविताना पोलिसांची व ग्रामस्थांच्या नाकीनऊ आले. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे आंबोलीतील दोन्ही बाजूच्या सुमारे चौदा किलोमीटर अंतरापर्यंत गाड्या कोंडी सुटण्याची वाट पाहत सुमारे सहा तास उभ्या होत्या. या गाड्यांमधील पर्यटकांनी पायी चालतच मुख्य धबधब्यापर्यंत जाणे पसंत केले. रविवार म्हणजे आंबोलीतील पर्यटनाला बहर येतो. हे माहिती असूनही केवळ २५ पोलिसांचा ताफा तैनात होता. यामुळे मद्यपी तसेच वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या पर्यटकांकडे पाहत राहण्याशिवाय पोलीस काहीही करत नव्हते. आंबोलीतील पर्यटनाला आतापर्यंत एवढा प्रतिसाद लाभलेला नसल्याने पोलिसांची कमी कुमक ठेवण्यात आली होती. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर झाला. तसेच पोलिसांसमोरच दंगामस्ती करणाऱ्या मद्यपी पर्यटकांवरही कारवाई करण्यास पोलीस धजावत नव्हते. त्यामुळे यापुढील कालावधीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. (वार्ताहर)