शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

आंबोलीने अनुभवली पर्यटकांची मांदियाळी

By admin | Updated: July 20, 2014 22:13 IST

सहा तास वाहतुकीचा खोळंबा : अपुरा पोलीस बंदोबस्त

आंबोली : आंबोलीने आज रविवारी रेकॉर्डब्रेक अशी लाखो पर्यटकांची मांदियाळी अनुभवली. मात्र, या पर्यटकांच्या गर्दीमुळे आंबोलीच्या सुमारे १४ किलोमीटर रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला होता. या वाहतुकीच्या कोंडीमुळे आंबोलीतील वाहतूक सहा तास खोळंबलेलीच होती. यातच अपुऱ्या पोलीस बंदोबस्तामुळे दुपारच्या सुमारात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या कोल्हापूर येथील मद्यपी पर्यटकांना ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागले.पावसामुळे जून महिन्यात सुरु होणारे पर्यटन पावसाच्या लांबलेल्या आगमनामुळे उशिरा सुरु झाले. परंतु, श्रावणासाठी काही दिवस उरलेले असतानाच आंबोली पर्यटकांनी फुललेली दिसून आली. रविवारचा सुट्टीचा मुहूर्त साधत आंबोली पर्यटनाची पंढरी बनली होती. कोल्हापूर, गोवा, कर्नाटक, रत्नागिरी यासह जिल्ह्यातील पर्यटकांनीही आंबोलीतील धुक्यामध्ये पावसाच्या रिमझिम धारांमध्ये धबधब्याचे पाणी अंगावर घेत मौजमजेसाठी आंबोलीत गर्दी केली होती. सुमारे लाखभर पर्यटक रविवारच्या दिवसभरात आंबोलीतील मुख्य धबधब्यांसह छोट्या धबधब्यात आनंद लुटत होते. मुख्य धबधब्यावरील गर्दी पाहून बऱ्याचशा पर्यटकांनी कावळेसाद, नांगरतास आदी ठिकाणवरही जात आस्वाद घेतला.आंबोलीत रविवारी मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे वाहतूक व्यवस्था पुरती कोलमडून गेली. येथील काही पर्यटकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्टॉलच्या समोरच गाड्या उभ्या केल्या होत्या. त्यानंतर वाहनांची गर्दी वाढत गेली. आणि वाहनांचा झालेला गोतावळा सोडविताना पोलिसांची व ग्रामस्थांच्या नाकीनऊ आले. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे आंबोलीतील दोन्ही बाजूच्या सुमारे चौदा किलोमीटर अंतरापर्यंत गाड्या कोंडी सुटण्याची वाट पाहत सुमारे सहा तास उभ्या होत्या. या गाड्यांमधील पर्यटकांनी पायी चालतच मुख्य धबधब्यापर्यंत जाणे पसंत केले. रविवार म्हणजे आंबोलीतील पर्यटनाला बहर येतो. हे माहिती असूनही केवळ २५ पोलिसांचा ताफा तैनात होता. यामुळे मद्यपी तसेच वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या पर्यटकांकडे पाहत राहण्याशिवाय पोलीस काहीही करत नव्हते. आंबोलीतील पर्यटनाला आतापर्यंत एवढा प्रतिसाद लाभलेला नसल्याने पोलिसांची कमी कुमक ठेवण्यात आली होती. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर झाला. तसेच पोलिसांसमोरच दंगामस्ती करणाऱ्या मद्यपी पर्यटकांवरही कारवाई करण्यास पोलीस धजावत नव्हते. त्यामुळे यापुढील कालावधीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. (वार्ताहर)