शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

तळकट वनोद्यान पर्यटकांचे आकर्षण

By admin | Updated: July 20, 2014 22:13 IST

पर्यटनास मिळणार चालना : पायाभूत सुविधांची वानवा ; प्राणी निरीक्षणाचे उभारलेत मनोरे

शिरीष नाईक - कसई दोडामार्गतळकट वनबागेत विविध वनौषधी, विविध जातीचे दुर्मीळ पक्षी, प्राणी अशी वनसंपदा विपुल प्रमाणात असल्याने हे उद्यान पर्यटनदृष्ट्या आकर्षण ठरत आहे. या वनबागेतील जंगली प्राणी सहज, सुलभरित्या पाहता यावेत, यासाठी प्राणी निरीक्षण मनोरे उभारण्यात आल्याने एकप्रकारे पर्यटनास चालना मिळाली आहे. दोडामार्ग तालुक्यापासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळकट येथील वन उद्यान फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. वनविभागाला लागूनच असल्याने या बागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बागेत विविध वनौषधी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे सुपारीची झाडे, आंबा कलमे, कोकम, नारळ इत्यादी उपयुक्त झाडांनी ही बाग बहरली आहे. त्यामुळे या बागेला वनबाग म्हणून नाव पडले. सद्यस्थितीत या बागेला ‘वनउद्यान’ म्हणूनही मान्यता देण्यात आली आहे. दोडामार्ग तालुका अस्तित्वात येण्यापूर्वी सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी वनविभाग हद्दीतील हे तळकट वनउद्यान प्रसिद्ध होते. या उद्यानामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी, मनोरंजनासाठी विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यात आले होते. या संपूर्ण परिसरात या बागेशिवाय अन्य मनोरंजनाचे साधन असल्याने सावंतवाडी तालुक्यातूनही जिल्हा परिषद शाळा, तसेच हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सहली येथे आणल्या जात असत. अशावेळी पक्षांबरोबरच विद्यार्थ्यांच्याही किलबिलाटाने ही बाग फुलून जात असे. आजही ही परिस्थिती बदललेली नाही. मनोरंजनाबरोबरच विविध वनौषधीचीही माहिती विद्यार्थ्यांना येथे मिळत असे. यासाठी प्रत्येक झाडावर माहितीचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे येथे आलेल्या सहली मनोरंजन आणि ज्ञान या दोन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेने सफल होत असत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वनोद्यानामध्ये २० लाख रुपये खर्च करून विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पर्यटकांना निवांत मिळण्यासाठी षट्कोनी घरकुल उभारण्यात आली आहेत. तसेच प्राणी आणि पक्षांचे निरीक्षण करण्यासाठी प्राणी निरीक्षण मनोरेही उभारण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी तर येथे विविध प्राणी पहावयास मिळतात. या वनउद्यानामध्ये जंगली प्राण्यांबरोबरच पट्टेरी वाघांचेही अस्तित्व आढळून आल्याने प्राणीमित्रांसाठी ही बाग आकर्षण ठरत आहे. ४ पर्यटकांसाठी अनेक सुविधा असल्या, तरी काही सुविधांची उणीव येथे आहेच. या वनउद्यानामध्ये राहण्यासाठी निवासी घरकुल नाही. तसेच चहानाष्टा, साफसफाई, पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईडस्, वीज आदी मुख्य सोयींची येथे अद्यापही वानवा आहे. या मुख्य समस्या वनक्षेत्रपाल यांनी लक्ष घालून सोडविल्यास या वनउद्यानास पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त होणार असून पर्यटनाच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगाराचे दालन खुले होऊ शकते.