शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार सर्व पक्षीय बैठकीत निर्णय : जनआंदोलन उभारण्याचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:40 IST

शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.टोपसह पाच ग्रामपंचायती व स्मॅकने एकत्रित जनहित याचिका दाखल करून कोल्हापूर शहराच्या कचऱ्याविरोधात जन आंदोलन उभा करण्याचा निर्णय टोप ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते.

राजीव आवळे म्हणाले, टोप गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये शहराचा कचरा कशासाठी? शहरातील आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात गेल्या आणि आता शहराचा कचरा आमच्या दारात का? सध्या शहराचा कचरा कसबा बावड्यात टाकला जातो. तेथील लोकांचा या कचºयाला सतत विरोध आहे. या घनकचºयामुळे शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मग हा कचरा टोपमध्ये आल्यावर येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकणार नाही का? शिये फाटा येथील टोपच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये कचरा आला तर शिरोली एमआयडीसीमध्ये येणाºया उद्योजक व कामगारांना, शिये गावाला, टोपमधील सध्या राहत असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास होणार आहे. या बैठकीला शिये जिल्हा परिषदेचे सदस्य मनीषा कुरणे, बाजीराव पाटील, संभापूरचे सरपंच प्रकाश झिरंगे, कृती समितीचे अध्यक्ष विठ्ठलपंत पाटील, उद्योजक धनाजी पाटील, आदी उपस्थित होते.राजू शेट्टी, मिणचेकर, नरके मुख्यमंत्र्यांना माहिती देणारशेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे दोन्ही आमदार मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास कदम यांची भेट घेऊन त्यांना कचºयाबाबत माहिती देणार आहेत.यावेळी टोपच्या सरपंच रूपाली तावडे म्हणाल्या, हा सामूहिक लढा आहे. टोपसह संभापूर, कासारवाडी, शिये, नागाव, शिरोली एमआयडीसी (स्मॅक) या सर्वांनी एकत्रितपणे येऊन हा लढा उभा करून कोल्हापूर शहराचा कचरा परतवून लावू. यासाठी सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे, तरच हा लढा यशस्वी होईल .स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, टोप येथील दगडखाणीमध्ये कोल्हापूर शहराचा कचरा आल्यावर उद्योजकांना व कामगारांना मोठा त्रास होणार आहे. भटकी कुत्री, डुकरे, जनावरे यांचा उपद्रव वाढेल. रोगराई पसरून कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. याला आमचा विरोधच राहील. या आंदोलनात स्मॅकचा सहभाग असेल.