शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार सर्व पक्षीय बैठकीत निर्णय : जनआंदोलन उभारण्याचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:40 IST

शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शिरोली : टोप खाणप्रश्नी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेऊन याविषयी भूमिका मांडण्याचा निर्णय आज, शनिवारी टोप येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.टोपसह पाच ग्रामपंचायती व स्मॅकने एकत्रित जनहित याचिका दाखल करून कोल्हापूर शहराच्या कचऱ्याविरोधात जन आंदोलन उभा करण्याचा निर्णय टोप ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजीव आवळे होते.

राजीव आवळे म्हणाले, टोप गावच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये शहराचा कचरा कशासाठी? शहरातील आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात गेल्या आणि आता शहराचा कचरा आमच्या दारात का? सध्या शहराचा कचरा कसबा बावड्यात टाकला जातो. तेथील लोकांचा या कचºयाला सतत विरोध आहे. या घनकचºयामुळे शहरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मग हा कचरा टोपमध्ये आल्यावर येथील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकणार नाही का? शिये फाटा येथील टोपच्या हद्दीतील दगडखाणीमध्ये कचरा आला तर शिरोली एमआयडीसीमध्ये येणाºया उद्योजक व कामगारांना, शिये गावाला, टोपमधील सध्या राहत असलेल्या लोकांना याचा मोठा त्रास होणार आहे. या बैठकीला शिये जिल्हा परिषदेचे सदस्य मनीषा कुरणे, बाजीराव पाटील, संभापूरचे सरपंच प्रकाश झिरंगे, कृती समितीचे अध्यक्ष विठ्ठलपंत पाटील, उद्योजक धनाजी पाटील, आदी उपस्थित होते.राजू शेट्टी, मिणचेकर, नरके मुख्यमंत्र्यांना माहिती देणारशेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे आमदार डॉ. सुजित मिणचेकर व चंद्रदीप नरके हे दोन्ही आमदार मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदास कदम यांची भेट घेऊन त्यांना कचºयाबाबत माहिती देणार आहेत.यावेळी टोपच्या सरपंच रूपाली तावडे म्हणाल्या, हा सामूहिक लढा आहे. टोपसह संभापूर, कासारवाडी, शिये, नागाव, शिरोली एमआयडीसी (स्मॅक) या सर्वांनी एकत्रितपणे येऊन हा लढा उभा करून कोल्हापूर शहराचा कचरा परतवून लावू. यासाठी सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे, तरच हा लढा यशस्वी होईल .स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, टोप येथील दगडखाणीमध्ये कोल्हापूर शहराचा कचरा आल्यावर उद्योजकांना व कामगारांना मोठा त्रास होणार आहे. भटकी कुत्री, डुकरे, जनावरे यांचा उपद्रव वाढेल. रोगराई पसरून कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. याला आमचा विरोधच राहील. या आंदोलनात स्मॅकचा सहभाग असेल.