शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

टोलची अंतिम सुनावणी सुरू

By admin | Updated: September 30, 2014 01:04 IST

आज निकाल शक्य : दोन्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे सादर; कोल्हापूरकरांचे निकालाकडे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूरच्या टोलप्रश्नी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिकांवर आज, सोमवारपासून अंतिम सुनावणी सुरू झाली. दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी न्यायालयाचा वेळ संपेपर्यंत अ‍ॅड. युवराज नरवणकर व अ‍ॅड. अभय नेवगी यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी व ए. के. मेनन यांच्या खंडपीठापुढे म्हणणे मांडले. उद्या, मंगळवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. न्यायिक स्तरावरील ही टोलबाबतची अंतिम सुनावणी असल्याने कोल्हापूरकरांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. ‘टोल रद्द’च्या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीतर्फे किरण पवार, चंद्रमोहन पाटील, सुभाष वाणी, शिवाजीराव परुळेकर व अमर नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आजपासून अंतिम सुनावणी सुरू झाली. न्यायालयाच्या पहिल्या सत्रात एक वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत शहर एकात्मिक रस्ते प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत, ९५ टक्के काम झालेले नाही, त्यामुळे ही बेकायदेशीर टोलवसुली रद्द करावी, अशी मागणी कृती समितीचे अ‍ॅड. नरवणकर यांनी केली. रस्ते प्रकल्पात ७० टक्क्यांपेक्षा कमी कामे झाली आहेत. युटिलिटी शिफ्टिंगचा मुद्दा प्रलंबित आहे. केलेल्या रस्त्यांच्या कामाला दर्जा नाही. तोडलेली वृक्षलागवडही केलेली नाही. प्रकल्पाच्या करारातील अटी व शर्थींचा ‘आयआरबी’ने केलेला भंग केला आहे, आदीं मुद्द्यांवर दुपारनंतर न्यायालयाचा वेळ संपेपर्यंत अ‍ॅड.अभय नेवगी यांनी पुराव्यांसह म्हणणे सादर केले, अशी माहिती याचिकाकर्ते सुभाष वाणी यांनी ‘लोकमत’ला दिली. उद्या सकाळी महापालिकातर्फे युटिलिटी शिफ्ंिटगबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासह अ‍ॅड. जमशेट कामा हे बाजू मांडणार आहेत. त्यानंतर ‘आयआरबी’चे म्हणणे ऐकू न घेत न्यायालय अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. ‘सर्वाेच्च आदेश’ मुंबई उच्च न्यायालयाने २१ एप्रिल २०१४ रोजी दिलेल्या निकालात कोल्हापूर शहरातील टोलवसुलीच्या स्थगितीचा अंतरिम आदेश रद्द करण्यास तात्पुरता नकार दिला होता. उच्च न्यायालयाची ही स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे २०१४ रोजी उठविली होती. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानेच ही अंतिम सुनावणी होत असल्याने न्यायिक स्तरावर ‘टोल’चा कंडका पडणार आहे. (प्रतिनिधी)