शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पुढील महिन्यात टोलवर निर्णय?

By admin | Updated: October 22, 2015 00:50 IST

काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाने जशी फसवणूक केली तशीच भाजप-शिवसेना सरकारकडून होईल,

कोल्हापूर : महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रलंबित राहिलेल्या कोल्हापूर शहरातील ‘टोल’वर आता निवडणुकीनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल, असे दिसते. राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी भाजप व शिवसेना या पक्षांनी टोल रद्द करण्याचा ‘शब्द’ कोल्हापूरकरांना दिला असून, तो रद्द करण्याच्यादृष्टीने वाटचालही सुरू झाली आहे; परंतु त्यात पुन्हा मनपा निवडणुकीचे विघ्न आले आहे. मनपा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप तसेच शिवसेनेने टोल रद्द करण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले असल्याने टोलचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तत्कालिन सरकारने कोल्हापूरकरांवर ‘टोलचे भूत’ लादले. त्याविरुद्ध शहरात मोठे आंदोलन उभारले. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. परिणामी राज्यातील टोल गाडून टाकण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप व शिवसेनेला सत्तेत आल्यानंतर राज्यातील जवळपास ४० हून अधिक ठिकाणचे टोलनाके बंद करावे लागले; परंतु कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचा विषय अधांतरी राहिला. मुंबईत १० आॅगस्टला रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूरच्या रस्त्यांच्या मूल्यांकनाची २३९ कोटी ६२ लाख एवढी रक्कम कशी द्यायची आणि कुठून उपलब्ध करायची यावर पर्याय सुचविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. हे काम मंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ११ सदस्यांच्या समितीवर सोपविले. दुदैवाने १५ दिवसांची मुदत संपली तरी पर्याय पुढे आले नाहीत, त्यामुळे मार्ग निघाला नाही. २६ आॅगस्टला पालकमंत्री पाटील यांनी जोपर्यंत रक्कम कशी द्यायची यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत टोल सुरू करायचा नाही, असे आयआरबी कंपनीला बजावले. त्यामुळे टोलची स्थगिती पुन्हा बेमुदत कायम राहिली. कॉँग्रेसच्या राजवटीत टोलला स्थगिती देऊनही त्याची पुन्हा वसुली झाली होती. आता भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्याची स्थगिती बेमुदत वाढविली आहे; परंतु मनपा निवडणुकीनंतर का होईना त्यांना टोल घालवावा लागणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाने जशी फसवणूक केली तशीच भाजप-शिवसेना सरकारकडून होईल, अशी भीती कोल्हापूरकरांच्या मनात आहे म्हणून ‘टोल रद्द’चा निर्णय पुढील महिन्यात घ्यावा लागेल. अन्यथा, तात्पुरते स्थगित झालेले आंदोलन पुन्हा सुरू होईल. सरकारला त्याचा सामना करावा लागणार आहे.