शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

पुढील महिन्यात टोलवर निर्णय?

By admin | Updated: October 22, 2015 00:50 IST

काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाने जशी फसवणूक केली तशीच भाजप-शिवसेना सरकारकडून होईल,

कोल्हापूर : महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे प्रलंबित राहिलेल्या कोल्हापूर शहरातील ‘टोल’वर आता निवडणुकीनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल, असे दिसते. राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी भाजप व शिवसेना या पक्षांनी टोल रद्द करण्याचा ‘शब्द’ कोल्हापूरकरांना दिला असून, तो रद्द करण्याच्यादृष्टीने वाटचालही सुरू झाली आहे; परंतु त्यात पुन्हा मनपा निवडणुकीचे विघ्न आले आहे. मनपा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप तसेच शिवसेनेने टोल रद्द करण्याचे पुन्हा एकदा आश्वासन दिले असल्याने टोलचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या तत्कालिन सरकारने कोल्हापूरकरांवर ‘टोलचे भूत’ लादले. त्याविरुद्ध शहरात मोठे आंदोलन उभारले. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. परिणामी राज्यातील टोल गाडून टाकण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप व शिवसेनेला सत्तेत आल्यानंतर राज्यातील जवळपास ४० हून अधिक ठिकाणचे टोलनाके बंद करावे लागले; परंतु कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचा विषय अधांतरी राहिला. मुंबईत १० आॅगस्टला रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोल्हापूरच्या रस्त्यांच्या मूल्यांकनाची २३९ कोटी ६२ लाख एवढी रक्कम कशी द्यायची आणि कुठून उपलब्ध करायची यावर पर्याय सुचविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. हे काम मंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ११ सदस्यांच्या समितीवर सोपविले. दुदैवाने १५ दिवसांची मुदत संपली तरी पर्याय पुढे आले नाहीत, त्यामुळे मार्ग निघाला नाही. २६ आॅगस्टला पालकमंत्री पाटील यांनी जोपर्यंत रक्कम कशी द्यायची यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत टोल सुरू करायचा नाही, असे आयआरबी कंपनीला बजावले. त्यामुळे टोलची स्थगिती पुन्हा बेमुदत कायम राहिली. कॉँग्रेसच्या राजवटीत टोलला स्थगिती देऊनही त्याची पुन्हा वसुली झाली होती. आता भाजप-शिवसेना सरकारच्या काळात त्याची स्थगिती बेमुदत वाढविली आहे; परंतु मनपा निवडणुकीनंतर का होईना त्यांना टोल घालवावा लागणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाने जशी फसवणूक केली तशीच भाजप-शिवसेना सरकारकडून होईल, अशी भीती कोल्हापूरकरांच्या मनात आहे म्हणून ‘टोल रद्द’चा निर्णय पुढील महिन्यात घ्यावा लागेल. अन्यथा, तात्पुरते स्थगित झालेले आंदोलन पुन्हा सुरू होईल. सरकारला त्याचा सामना करावा लागणार आहे.