शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.ची आजची सभा गाजणार

By admin | Updated: September 22, 2016 00:46 IST

खरेदीची प्रकरणे चर्चेत : ‘बांधकाम’च्या त्या विषयावरही होणार चर्चा

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची मंगळवारी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज, गुरुवारी दुपारी एक वाजता होणार असून, याआधीच्या विषयांबरोबरच बांधकाम विभागाच्या नव्या आदेशावर पुन्हा एकदा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या विभागांच्या खरेदीवरून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सभेमध्ये काही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाच्या नव्या आदेशानुसार प्राधान्यक्रमानुसार रस्ते होणार असल्याने यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याची तक्रार करीत मंगळवारची सभा तहकूब करण्यात आली. याच विषयाबाबत पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना भेटले होते. त्यामुळे या विषयावर पुढे काय? अशी विचारणा या आज, गुरुवारच्या सभेत पुन्हा होणारच आहे. तसेच समाजकल्याणपासून कृषी विभागापर्यंतच्या अनेक विभागांच्या खरेदी प्रकरणी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांवर आरोपही केले गेले. या पार्श्वभूमीवर ही सभा होत असून, मंगळवारी सकाळी झालेल्या अधिकारी, पदाधिकारी यांच्या बैठकीत मोठी ताणाताणी झाली होती. अधिक निधी मिळणार जिल्हा नियोजन मंडळातून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी गेल्यावर्षी १0, तर यंदा १२ कोटी रुपये मिळाले आहेत; परंतु याआधी जिल्हा परिषदेचा ‘ना हरकत’ दाखला घेऊन जिल्हा परिषदेचे मोठ्या रकमेचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असे, परंतु यंदा याबाबत ग्रामीण विकास विभागाने स्वतंत्र आदेश काढून हा निधी जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय झाला आहे. क्षेत्रफळानुसार निधी निधी आणि तालुक्याचे क्षेत्रफळ यांच्या प्रमाणात निधीचे वाटप होणार असल्याने ज्या तालुक्यांचे क्षेत्रफळ अधिक आहे, अशा तालुक्यांना जादा निधी मिळणार आहे. हे लक्षात आल्यानंतरही आपला विरोध कमी करण्याच्या भूमिकेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा डोस आणि मवाळ भूमिका बांधकाम विभागाबाबत शासनाचा निर्णय झाल्याने त्यात बदल करणे सोपे नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे मांडल्याने काही सदस्य आता मवाळ भूमिकेत आले आहेत. अध्यक्ष विमल पाटील यांच्या माध्यमातून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांशी दूरध्वनीवरून बोलल्यानंतर त्यांनीही आम्ही शासन निर्णयानुसारच रस्त्यांची कामे करणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत काही आमदारांच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत यात बदल होईल का? याबाबत चाचपणी केली असता त्यात बदल होणार नाही, असे सांगण्यात आल्याचे काही अध्यक्षांनी सांगितले.