शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक-सतेज पाटील गटाचे आज अर्ज

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

‘राजाराम’ची रणधुमाळी : शक्तिप्रदर्शन नाही

कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, सोमवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल होणार आहेत.करवीर, हातकणंगले, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी आणि कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा धुरळा आता सर्वत्र जोरात उडाला आहे. चुरसही वाढली आहे. १९ एप्रिलला मतदान आणि २० एप्रिलला निकाल असणाऱ्या या निवडणुकीसाठी गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तब्बल २१९ अर्जांची विक्री होऊन ६८ जणांनी अर्ज दाखल केले.या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील गटातील टोकाचा संघर्ष पुन्हा एकदा पाहावयास मिळणार आहे. दोन्हीही गटांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी (दि. २४) छाननी होणार आहे, तर २५ तारखेला छाननीनंतरची उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. बुधवारी (दि. ८ एप्रिल)पर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. ९ एप्रिलला पात्र उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोन्हीही गटांकडून कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार नाही. जशा नेत्यांकडून सूचना येतील, त्याप्रमाणे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही गटांकडून काही उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तरीही आज आणखी अर्ज दाखल केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)