शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा आज फैसला कुरुंदवाड नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:59 IST

येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात,

ठळक मुद्देनगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

गणपती कोळी ।कुरुंदवाड : येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या निकालावरुन शहरात व पालिकेत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे तर भाजप विरोधी बाकावर आहे. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक असून अवघ्या वर्षभरातच राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट पडली. आघाडी नेते रावसाहेब पाटील व पक्षप्रतोद जवाहर पाटील यांच्या पक्षीय कारभारावर आक्षेप घेत तीन महिन्यापूर्वी पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे किरण जोंग, स्नेहल कांबळे व नरगीस बारगीर यांनी पक्षाचा व्हीप डावलून विरोधी मतदान केले होते.

व्हीपचा आदेश डावलल्याने पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी विरोधात गेलेल्या तीनही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, अशी तक्रार जिल्हाधिकाºयांच्याकडे केली होती. गेली अडीच महिने दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले होते. ९० दिवसांत या प्रकरणाचा निकाल देणे जिल्हाधिकाºयांना बंधनकारक आहे. गुरुवारी (दि. १२) हा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने आजच जिल्हाधिकारी निकाल देण्याची शक्यता आहे.वादी व प्रतिवादी नगरसेवकांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून विरोधात गेल्यास अपिलात जाण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, नगरसेवकपद अपात्र ठरल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. एकूणच या निकालावरुन शहरातील व पालिकेतील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे....तर सत्ता अल्पमतात!पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप विरोधी बाकावर आहे. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या या तीनही नगरसेवकांनी भाजपपुरस्कृत सुशील भबिरे यांच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात या तीनही नगरसेवकांच्या बाजूने भाजप सक्षमपणे उभे राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयात राजकीय हस्तक्षेप (पालकमंत्र्यांचा अप्रत्यक्ष सहभाग) झाला व राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदाचा अर्ज फेटाळून नगरसेवकपद पात्र ठेवल्यास तीनही नगरसेवक भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता अल्पमतातही येऊ शकते.निर्णय अपिलात जाणार? जिल्हाधिकाºयांचा निकालवादी अथवा प्रतिवादी यांच्याविरोधात गेल्यास त्यांना अपिलात जाता येते. त्यामुळे हा वाद नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कोर्टात जाऊ शकतो. त्यांना सहा महिन्यांत या अपिलावर निर्णय देणे बंधनकारक आहे.