शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा आज फैसला कुरुंदवाड नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:59 IST

येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात,

ठळक मुद्देनगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

गणपती कोळी ।कुरुंदवाड : येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या निकालावरुन शहरात व पालिकेत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे तर भाजप विरोधी बाकावर आहे. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक असून अवघ्या वर्षभरातच राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट पडली. आघाडी नेते रावसाहेब पाटील व पक्षप्रतोद जवाहर पाटील यांच्या पक्षीय कारभारावर आक्षेप घेत तीन महिन्यापूर्वी पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे किरण जोंग, स्नेहल कांबळे व नरगीस बारगीर यांनी पक्षाचा व्हीप डावलून विरोधी मतदान केले होते.

व्हीपचा आदेश डावलल्याने पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी विरोधात गेलेल्या तीनही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, अशी तक्रार जिल्हाधिकाºयांच्याकडे केली होती. गेली अडीच महिने दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले होते. ९० दिवसांत या प्रकरणाचा निकाल देणे जिल्हाधिकाºयांना बंधनकारक आहे. गुरुवारी (दि. १२) हा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने आजच जिल्हाधिकारी निकाल देण्याची शक्यता आहे.वादी व प्रतिवादी नगरसेवकांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून विरोधात गेल्यास अपिलात जाण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, नगरसेवकपद अपात्र ठरल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. एकूणच या निकालावरुन शहरातील व पालिकेतील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे....तर सत्ता अल्पमतात!पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप विरोधी बाकावर आहे. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या या तीनही नगरसेवकांनी भाजपपुरस्कृत सुशील भबिरे यांच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात या तीनही नगरसेवकांच्या बाजूने भाजप सक्षमपणे उभे राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयात राजकीय हस्तक्षेप (पालकमंत्र्यांचा अप्रत्यक्ष सहभाग) झाला व राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदाचा अर्ज फेटाळून नगरसेवकपद पात्र ठेवल्यास तीनही नगरसेवक भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता अल्पमतातही येऊ शकते.निर्णय अपिलात जाणार? जिल्हाधिकाºयांचा निकालवादी अथवा प्रतिवादी यांच्याविरोधात गेल्यास त्यांना अपिलात जाता येते. त्यामुळे हा वाद नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कोर्टात जाऊ शकतो. त्यांना सहा महिन्यांत या अपिलावर निर्णय देणे बंधनकारक आहे.