शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा आज फैसला कुरुंदवाड नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:59 IST

येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात,

ठळक मुद्देनगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

गणपती कोळी ।कुरुंदवाड : येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या निकालावरुन शहरात व पालिकेत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे तर भाजप विरोधी बाकावर आहे. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक असून अवघ्या वर्षभरातच राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट पडली. आघाडी नेते रावसाहेब पाटील व पक्षप्रतोद जवाहर पाटील यांच्या पक्षीय कारभारावर आक्षेप घेत तीन महिन्यापूर्वी पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे किरण जोंग, स्नेहल कांबळे व नरगीस बारगीर यांनी पक्षाचा व्हीप डावलून विरोधी मतदान केले होते.

व्हीपचा आदेश डावलल्याने पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी विरोधात गेलेल्या तीनही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, अशी तक्रार जिल्हाधिकाºयांच्याकडे केली होती. गेली अडीच महिने दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले होते. ९० दिवसांत या प्रकरणाचा निकाल देणे जिल्हाधिकाºयांना बंधनकारक आहे. गुरुवारी (दि. १२) हा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने आजच जिल्हाधिकारी निकाल देण्याची शक्यता आहे.वादी व प्रतिवादी नगरसेवकांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून विरोधात गेल्यास अपिलात जाण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, नगरसेवकपद अपात्र ठरल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. एकूणच या निकालावरुन शहरातील व पालिकेतील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे....तर सत्ता अल्पमतात!पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप विरोधी बाकावर आहे. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या या तीनही नगरसेवकांनी भाजपपुरस्कृत सुशील भबिरे यांच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात या तीनही नगरसेवकांच्या बाजूने भाजप सक्षमपणे उभे राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयात राजकीय हस्तक्षेप (पालकमंत्र्यांचा अप्रत्यक्ष सहभाग) झाला व राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदाचा अर्ज फेटाळून नगरसेवकपद पात्र ठेवल्यास तीनही नगरसेवक भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता अल्पमतातही येऊ शकते.निर्णय अपिलात जाणार? जिल्हाधिकाºयांचा निकालवादी अथवा प्रतिवादी यांच्याविरोधात गेल्यास त्यांना अपिलात जाता येते. त्यामुळे हा वाद नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कोर्टात जाऊ शकतो. त्यांना सहा महिन्यांत या अपिलावर निर्णय देणे बंधनकारक आहे.