शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात कॉँग्रेसचे आज गोदाम खाली करा आंदोलन; जमावबंदी

By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST

गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सुमारे २४ हजार क्विंटल भात गोडावूनमध्ये असल्याने यावर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आले नाही

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा काँग्रेसने ‘भात गोडावूनखाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी कठोर पावले उचलून संबंधित २२ गोडावून परिसरात जमावबंदी लागू केली आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.गतवर्षी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले सुमारे २४ हजार क्विंटल भात गोडावूनमध्ये असल्याने यावर्षी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना भात विकून टाकले. याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने १९ जानेवारीला धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांकडून भात खरेदी करतो, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, त्याची कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व आमदार नीतेश राणे यांनी २७ मे रोजी कणकवली तालुक्यातील जानवली गोडावून, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी व सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गोडावून या तीन गोडावूनमध्ये ‘भात गोडावून खाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.त्यानुसार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील २२ गोडावूनच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात १९७३चे कलम १४४ नुसार जमावबंदी लागू केली आहे. तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ही जमावबंदी २७ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २८ मे रोजीपर्यंत सकाळी ७ वाजेपर्यंत राहणार आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्षकाँग्रेसच्यावतीने ‘भात गोडावून खाली आंदोलन’ करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन प्रमुख ई. रवींद्रन यांनी आपल्या अधिकारात संबंधित गोडावून परिसरात जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व आमदार नीतेश राणे कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.