शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

यंदा मिरचीचा ठसका कमी लागणार

By admin | Updated: February 17, 2017 01:15 IST

मिरच्यांचे दर ३० टक्क्यांनी खाली : आंध्र प्रदेश, कर्नाटकातून दररोज तीन ट्रक आवक

 कोल्हापूर : यंदा चटणी झणझणीत झाली तरी ग्राहकांना दराचा ठसका कमी लागणार आहे; कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीच्या दरात यंदा ३० ते ४० टक्के घसरण झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकातून विविध जातींच्या मिरच्यांची दररोज तीन ट्रक भरून आवक होऊ लागली आहे. यासह चटणी कांडपासाठी पेठापेठांमधील दळप-कांडप यंत्रांवरही गर्दी दिसू लागली आहे. कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी म्हणून कोल्हापूरच्या चटणीला राज्यासह परराज्यांतही मोठी मागणी आहे. या कोल्हापुरी चटणीसाठी खास लवंगी व ब्याडगी मिरची या दोन जातींच्या मिरच्या एकत्र करून बनविलेल्या चटणीला अर्थातच ‘कोल्हापुरी चटणी’ला बाजारात मोठी मागणी आहे. सद्य:स्थितीत कोल्हापुरात आंध्रप्रदेशातून गुंटूर व चवीसाठी व किमतीतही चढा दर मिळणारी संकेश्वरी जवारी, लालभडक रंगासाठी काश्मिरी जातीच्या मिरच्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नित्यनियमाने उन्हाळ्याची चाहूल लागताच कोल्हापुरातील बहुतांश घरांमध्ये मसाले भाजण्याचा घमघमाट सर्वत्र सुटतो. तो सुरू झाला की समजायचे, वर्षाच्या चटणीची तयारी सुरू झाली! याच काळात राज्यासह परराज्यांतून विविध जातींच्या व चवींच्या मिरच्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड, कपीलतीर्थ, पाडळकर मार्केट, आदी बाजारपेठांत ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी होत आहे. यंदा पावसाने चांगला हात दिल्याने राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, आदी ठिकाणी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे बाजारात मिरचीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. तयार चटणीपूड घेण्याकडेही काहींचा कल असतो. तरीही पेठापेठांमध्ये मिरच्या विकत घेऊन, त्या वाळवून पारंपरिक डंगावर नेऊन त्यांची चटणीपूड केली जाते. त्यानंतर लागेल त्या प्रमाणात कांदा-लसूण चटणी तयार केली जाते. यंदा पावसाने हात दिल्याने मिरचीचे दर ३० ते ४० टक्के दर खाली आले आहेत. आवकही दिवसाला तीन ट्रक अशी आंध्र, कर्नाटकातून कोल्हापूरच्या बाजारपेठेत होऊ लागली आहे. या मिरच्यांसह नव्याने हायब्रीड प्रकारची मिरचीही दाखल झाली आहे. तिचा प्रतिकिलो दर ९० रुपये दरम्यान इतका स्वस्त आहे. मात्र, चव, रंग आणि टिकाऊपणा यात दर्जाहीन आहे. - पापाभाई बागवान, मिरची व्यापारी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर एक किलोसाठी एक तोळा मसालेएक किलो चटणी बनविण्यासाठी सर्वसाधारणपणे धने, जिरे, तीळ, खोबरे, हळकुंड, लवंग, दालचिनी, मोहरी, हिंग, बदामफूल, मेथी, मसाला वेलदोडे, काळी मिरी, नाकेश्वर, रामपत्री, धोंडफूल, जायफळ, खसखस, बडीशेप, मीठ, शहाजिरे, हिरवे वेलदोडे, तमालपत्री या मसाल्यांचा वापर केला जातो. एक किलोसाठी प्रत्येकी एक तोळा मसाले वापरले जातात. यासाठी किमान आजच्या परिस्थितीत ३२० ते ३५० रुपये इतका खर्च येतो. याशिवाय प्रतिकिलो तिखटपूड बनविण्यासाठी ३० ते ४० रुपये इतका किलो दर आहे.