शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

यंदा मिरचीचा ठसका कमी लागणार

By admin | Updated: February 17, 2017 01:15 IST

मिरच्यांचे दर ३० टक्क्यांनी खाली : आंध्र प्रदेश, कर्नाटकातून दररोज तीन ट्रक आवक

 कोल्हापूर : यंदा चटणी झणझणीत झाली तरी ग्राहकांना दराचा ठसका कमी लागणार आहे; कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीच्या दरात यंदा ३० ते ४० टक्के घसरण झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटकातून विविध जातींच्या मिरच्यांची दररोज तीन ट्रक भरून आवक होऊ लागली आहे. यासह चटणी कांडपासाठी पेठापेठांमधील दळप-कांडप यंत्रांवरही गर्दी दिसू लागली आहे. कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी म्हणून कोल्हापूरच्या चटणीला राज्यासह परराज्यांतही मोठी मागणी आहे. या कोल्हापुरी चटणीसाठी खास लवंगी व ब्याडगी मिरची या दोन जातींच्या मिरच्या एकत्र करून बनविलेल्या चटणीला अर्थातच ‘कोल्हापुरी चटणी’ला बाजारात मोठी मागणी आहे. सद्य:स्थितीत कोल्हापुरात आंध्रप्रदेशातून गुंटूर व चवीसाठी व किमतीतही चढा दर मिळणारी संकेश्वरी जवारी, लालभडक रंगासाठी काश्मिरी जातीच्या मिरच्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. नित्यनियमाने उन्हाळ्याची चाहूल लागताच कोल्हापुरातील बहुतांश घरांमध्ये मसाले भाजण्याचा घमघमाट सर्वत्र सुटतो. तो सुरू झाला की समजायचे, वर्षाच्या चटणीची तयारी सुरू झाली! याच काळात राज्यासह परराज्यांतून विविध जातींच्या व चवींच्या मिरच्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. लक्ष्मीपुरी, मार्केट यार्ड, कपीलतीर्थ, पाडळकर मार्केट, आदी बाजारपेठांत ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी होत आहे. यंदा पावसाने चांगला हात दिल्याने राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, आदी ठिकाणी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे बाजारात मिरचीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. तयार चटणीपूड घेण्याकडेही काहींचा कल असतो. तरीही पेठापेठांमध्ये मिरच्या विकत घेऊन, त्या वाळवून पारंपरिक डंगावर नेऊन त्यांची चटणीपूड केली जाते. त्यानंतर लागेल त्या प्रमाणात कांदा-लसूण चटणी तयार केली जाते. यंदा पावसाने हात दिल्याने मिरचीचे दर ३० ते ४० टक्के दर खाली आले आहेत. आवकही दिवसाला तीन ट्रक अशी आंध्र, कर्नाटकातून कोल्हापूरच्या बाजारपेठेत होऊ लागली आहे. या मिरच्यांसह नव्याने हायब्रीड प्रकारची मिरचीही दाखल झाली आहे. तिचा प्रतिकिलो दर ९० रुपये दरम्यान इतका स्वस्त आहे. मात्र, चव, रंग आणि टिकाऊपणा यात दर्जाहीन आहे. - पापाभाई बागवान, मिरची व्यापारी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर एक किलोसाठी एक तोळा मसालेएक किलो चटणी बनविण्यासाठी सर्वसाधारणपणे धने, जिरे, तीळ, खोबरे, हळकुंड, लवंग, दालचिनी, मोहरी, हिंग, बदामफूल, मेथी, मसाला वेलदोडे, काळी मिरी, नाकेश्वर, रामपत्री, धोंडफूल, जायफळ, खसखस, बडीशेप, मीठ, शहाजिरे, हिरवे वेलदोडे, तमालपत्री या मसाल्यांचा वापर केला जातो. एक किलोसाठी प्रत्येकी एक तोळा मसाले वापरले जातात. यासाठी किमान आजच्या परिस्थितीत ३२० ते ३५० रुपये इतका खर्च येतो. याशिवाय प्रतिकिलो तिखटपूड बनविण्यासाठी ३० ते ४० रुपये इतका किलो दर आहे.