शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

शेतकऱ्यांवर वाळलेल्या उसाचे ओझे वाहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महापुराने नदीकाठच्या ऊसशेतीचे वाळवण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तांबट रंगात माखलेला ऊस आता मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : महापुराने नदीकाठच्या ऊसशेतीचे वाळवण झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तांबट रंगात माखलेला ऊस आता मात्र काळपट होऊन वाळला आहे. ऊस कुजल्याने कुबट वासाचे साम्राज्य पसरले आहे. उत्पादन नसेना वैरण तरी हाताला लागेल तेही नाही झाले तर कांड्या वाळवून जळण म्हणून वापरता येईल यासाठी उसकापणीची धांदल शिवारात पाहवयास मिळते. उसासारख्या नगदी पिकाच्या नुकसानीचे ओझं वाहण्याची वेळ महापुराने शेतकऱ्यांवर आणली आहे.

उसाच्या लागणी,खोडवी माना मुरगुळून पडल्या आहेत. अनेक ठिकाणी उंचापुरा जोमदार आलेला ऊस भुईसपाट होऊन शुद्ध हरपल्याच्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. आठ-दहा महिने राबराब राबून मशागत, खते देऊन दमदार आणलेला हिरवागार ऊस महिन्यात काळवंडलेला अन् निर्जीव झालेला ऊस पाहताना शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने भरू लागले आहेत. सोयाबीन,भुईमूग, कडधान्ये अस्तित्वहीन झाली. त्यामुळे वारणा नदीकाठचा परिसर व्यापक नुकसानीत गुरफटला आहे. यातून बळीराजा कसे कसे पुन्हा सावरून उभे राहायचे या विवंचनेत सापडला आहे.

पूर ओसल्यानंतर काही दिवसांत शेतकरी आपल्या पिकांची अवस्था पाहण्यासाठी धाडसाने शिवारात जाऊ लागले. पिकांची स्थिती किती विदारक असेल या चिंतेने जाण्याचे धाडस करीत नव्हते. पण पंचनामाच्या निमित्ताने कृषी विभागातील अधिकाऱ्यांबरोबर शेतात जाणे भाग पडले. त्यांना नुकसानीची चित्रमय स्थिती हादरवणारी वाटली. अद्यापही नदीकाठी शेतात पोहचणे मुश्कील झाले आहे.

उसाच्या सुरळीत पाणी ,गाळ गेल्याने कुजण्याची प्रक्रिया झपाट्याने झाली आहे. बगल फुटवा कुठे तरी फुटू लागला आहे. पण त्याचा उसाच्या पकवतेसाठी उपयोग नाही. काही भागातील ऊस दशी फुटून पोकळ होऊ लागला आहे. अशक्त उसाचे प्रमाणही वाढत चालले आहे.

शेतकरी मात्र जे काही हाताला लागेल तसे शेताच्या बाहेर काढू लागले आहेत. विशेष म्हणजे जो ऊस जनावरांना खाण्यायोग्य नाही तो वाळत घालून जळण म्हणून उपयोग होईल, अशी आशा बाळगू लागला आहे. जो काही ऊस थोडा फार तरला आहे. तो कारखान्याला लवकर जावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागला आहे.