शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

'चंद्रपुरातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 14:21 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत्या दोन वर्षांत वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

कोल्हापूर : दक्षिणेकडील तसेच तिलारीकडे असणारे वाघ वरच्या बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येत नाहीत असे निरीक्षण आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षांत यामध्ये वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

लिमये म्हणाले, राज्यात ३०० वाघ आहेत. यातील १५० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यातील एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यात ६० हून अधिक वाघ आहेत. त्यामुळे येथील काही वाघ अन्य ठिकाणी नेण्याचे नियोजन आहे. राजस्थान राज्यानेही आमच्याकडे काही वाघ मागितले आहेत. परंतु, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील समिती निर्णय घेते. राजस्थानला वाघ देण्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वर्षांत आणले जातील. त्याआधी त्यांच्यासाठीचे नैसर्गिक खाद्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. सांबर आणि काळवीट हे त्यांचे प्रामुख्याने अन्न आहे. परंतु, हे दोन्ही प्राणी सह्याद्रीच्या या पट्ट्यात कमी आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत १०० हून अधिक सांबर आणून चांदोलीतील झोळंबी येथे ठेवण्यात येतील. त्यांची संख्या वाढल्यानंतर वाघ आणले जातील.

सांबरांची संख्या वाढली की मग वाघ

एकदा का सांबर आणि काळविटांना पिल्ले झाली, संख्या पुरेशी वाढू लागली की मोठ्या सांबर, काळविटांना जंगलात सोडले जाईल. त्यानंतर दोन, तीन नर वाघ आणि मादी आणली जाईल, असे यावेळी लिमये यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघ