शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

'चंद्रपुरातील वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 14:21 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येत्या दोन वर्षांत वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

कोल्हापूर : दक्षिणेकडील तसेच तिलारीकडे असणारे वाघ वरच्या बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येत नाहीत असे निरीक्षण आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षांत यामध्ये वाघ आणून ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.

लिमये म्हणाले, राज्यात ३०० वाघ आहेत. यातील १५० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. त्यातील एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यात ६० हून अधिक वाघ आहेत. त्यामुळे येथील काही वाघ अन्य ठिकाणी नेण्याचे नियोजन आहे. राजस्थान राज्यानेही आमच्याकडे काही वाघ मागितले आहेत. परंतु, त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील समिती निर्णय घेते. राजस्थानला वाघ देण्याबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील काही वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दोन वर्षांत आणले जातील. त्याआधी त्यांच्यासाठीचे नैसर्गिक खाद्य उपलब्ध असणे आवश्यक आहे. सांबर आणि काळवीट हे त्यांचे प्रामुख्याने अन्न आहे. परंतु, हे दोन्ही प्राणी सह्याद्रीच्या या पट्ट्यात कमी आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत १०० हून अधिक सांबर आणून चांदोलीतील झोळंबी येथे ठेवण्यात येतील. त्यांची संख्या वाढल्यानंतर वाघ आणले जातील.

सांबरांची संख्या वाढली की मग वाघ

एकदा का सांबर आणि काळविटांना पिल्ले झाली, संख्या पुरेशी वाढू लागली की मोठ्या सांबर, काळविटांना जंगलात सोडले जाईल. त्यानंतर दोन, तीन नर वाघ आणि मादी आणली जाईल, असे यावेळी लिमये यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघ