शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

तीन टोल नाके उभारण्याचा घाट

By admin | Updated: September 2, 2015 23:27 IST

सांगली-कोल्हापूर रस्ता : एकाच ठिकाणी टोल बसविण्याची आंदोलन अंकुशची मागणी

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्याचे ५० टक्केही काम झाले नसताना सुप्रीम कंपनीकडून टोल उभारण्याची गडबड सुरू झाली आहे. तसेच एकाच ठिकाणी टोल बुथ उभा करण्याचा करार केला असला, तरी तीन ठिकाणी टोल उभारण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय कंपनीला पूर्णत्वाचा दाखला दऊ नये. तसेच टोल वसुलीचा कालावधी कमी करण्यात यावा व करारानुसारच टोल बसविण्यात यावा, अशी मागणी आंदोलन अंकुश संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर २०१० मध्ये सुप्रीम कंपनीला देण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनी या कंपनीने काम सुरू केले. रस्त्याचे काम पाच विभागांत सुरू असून, शिरोली ते बसवान खिंड चौपदरीकरण, अंकली ते सांगली चौकपदरीकरण, बसवान खिंड ते जैनापूरमार्गे अंकली दुपदरी व बसवानखिंड ते जयसिंंगपूरमार्गे अंकली दुपदरी, असे काम सुरू आहे. मात्र, आजअखेर ५० टक्केही काम झालेले नाही. मार्गावर २०० मी, ५०० मी, रस्त्याची लांबी दर्शविणारे किलोमीटर स्टोन बसविण्यात आले नाहीत. महामार्ग चौपदरीकरणात अडीच हजार झाडांची कत्तल झाली असताना सुप्रीम कंपनी मात्र महामार्गावर वृक्षारोपण करणार नसल्याचे समजते.अंदाज पत्रकातील सर्व परिच्छेदांत सर्व काम पूर्ण केल्यानंतर मक्तेदाराने कामात गुंतविलेल्या रकमेचा परतावा म्हणून टोलरूपाने ३० वर्षे वसूल करण्याचा करार आहे. मात्र, २०१० सालच्या रस्त्यावरील पीसीओ वरून ३० वर्षांचा करार करण्यात आलेला असून, टोल वसुलीची मुदत कमी करावी लागणार आहे, अन्यथा सामान्य नागरिकांच्या माथ्यावर हे टोलचे भूत बसणार आहे. कंपनीला टोल वसुलीसाठी करारानुसार बसवानखिंड येथे एकाच ठिकाणी टोल वसुली करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच वसुली केली जावी. तसेच शंभर टक्के काम पूर्ण झाल्याखेरीज कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंदोलन अंकुशच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसुलीची मुदत कमी करागेल्या पाच वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम अगदी रेंगाळत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. २०१०ला चौपदरीकरणाची निविदा काढण्यात आली. व दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, २०१२ ला रस्त्याचे काम सुरू झाले ते अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे २०१० च्या पीसीओ प्रमाणे ३० वर्षे टोलवसुलीची मुदत दिली होती. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्याने पाच वर्षांत रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टोल वसुलीची मुदत कमी करण्याची गरज आहे.तीन टोलनाक्यांचा घाटसार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सांगली-कोल्हापूर रस्ता चौपदरीकरणाच्या करारात एकाच ठिकाणी टोल बसविण्याची अट आहे. मात्र, सुप्रीम कंपनीकडून तीन ठिकाणी टोल बसविण्याचा घाट घातला आहे. तसेच काम अपूर्ण असताना टोल उभारल्यास जनआंदोलन उभारून त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. तसेच उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.