शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

तीन टोल नाके उभारण्याचा घाट

By admin | Updated: September 2, 2015 23:27 IST

सांगली-कोल्हापूर रस्ता : एकाच ठिकाणी टोल बसविण्याची आंदोलन अंकुशची मागणी

जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्याचे ५० टक्केही काम झाले नसताना सुप्रीम कंपनीकडून टोल उभारण्याची गडबड सुरू झाली आहे. तसेच एकाच ठिकाणी टोल बुथ उभा करण्याचा करार केला असला, तरी तीन ठिकाणी टोल उभारण्याची तयारी कंपनीने सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय कंपनीला पूर्णत्वाचा दाखला दऊ नये. तसेच टोल वसुलीचा कालावधी कमी करण्यात यावा व करारानुसारच टोल बसविण्यात यावा, अशी मागणी आंदोलन अंकुश संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वावर २०१० मध्ये सुप्रीम कंपनीला देण्यात आली होती. तब्बल दोन वर्षांनी या कंपनीने काम सुरू केले. रस्त्याचे काम पाच विभागांत सुरू असून, शिरोली ते बसवान खिंड चौपदरीकरण, अंकली ते सांगली चौकपदरीकरण, बसवान खिंड ते जैनापूरमार्गे अंकली दुपदरी व बसवानखिंड ते जयसिंंगपूरमार्गे अंकली दुपदरी, असे काम सुरू आहे. मात्र, आजअखेर ५० टक्केही काम झालेले नाही. मार्गावर २०० मी, ५०० मी, रस्त्याची लांबी दर्शविणारे किलोमीटर स्टोन बसविण्यात आले नाहीत. महामार्ग चौपदरीकरणात अडीच हजार झाडांची कत्तल झाली असताना सुप्रीम कंपनी मात्र महामार्गावर वृक्षारोपण करणार नसल्याचे समजते.अंदाज पत्रकातील सर्व परिच्छेदांत सर्व काम पूर्ण केल्यानंतर मक्तेदाराने कामात गुंतविलेल्या रकमेचा परतावा म्हणून टोलरूपाने ३० वर्षे वसूल करण्याचा करार आहे. मात्र, २०१० सालच्या रस्त्यावरील पीसीओ वरून ३० वर्षांचा करार करण्यात आलेला असून, टोल वसुलीची मुदत कमी करावी लागणार आहे, अन्यथा सामान्य नागरिकांच्या माथ्यावर हे टोलचे भूत बसणार आहे. कंपनीला टोल वसुलीसाठी करारानुसार बसवानखिंड येथे एकाच ठिकाणी टोल वसुली करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच वसुली केली जावी. तसेच शंभर टक्के काम पूर्ण झाल्याखेरीज कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आंदोलन अंकुशच्यावतीने करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वसुलीची मुदत कमी करागेल्या पाच वर्षांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाचे काम अगदी रेंगाळत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. २०१०ला चौपदरीकरणाची निविदा काढण्यात आली. व दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, २०१२ ला रस्त्याचे काम सुरू झाले ते अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे २०१० च्या पीसीओ प्रमाणे ३० वर्षे टोलवसुलीची मुदत दिली होती. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्याने पाच वर्षांत रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे टोल वसुलीची मुदत कमी करण्याची गरज आहे.तीन टोलनाक्यांचा घाटसार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या सांगली-कोल्हापूर रस्ता चौपदरीकरणाच्या करारात एकाच ठिकाणी टोल बसविण्याची अट आहे. मात्र, सुप्रीम कंपनीकडून तीन ठिकाणी टोल बसविण्याचा घाट घातला आहे. तसेच काम अपूर्ण असताना टोल उभारल्यास जनआंदोलन उभारून त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. तसेच उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला.