शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस योजनेच्या अनुदानात तीन हजारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:37 IST

< p >आयुब मुल्ला।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : बायोगॅस योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. १ घनमीटर ते ६ घनमीटरपर्यंतच्या बायोगॅसलाच यापूर्वी अनुदान दिले जात होते. आता २५ घनमीटरपर्यंतच्या बायोगॅसलाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक वापरासाठी बायोगॅसचा वापर होणार आहे. नगरपालिका, ग्रामपंचायतींना ही योजना स्वत: राबविता येणार आहे. ...

<p>आयुब मुल्ला।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : बायोगॅस योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. १ घनमीटर ते ६ घनमीटरपर्यंतच्या बायोगॅसलाच यापूर्वी अनुदान दिले जात होते. आता २५ घनमीटरपर्यंतच्या बायोगॅसलाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक वापरासाठी बायोगॅसचा वापर होणार आहे. नगरपालिका, ग्रामपंचायतींना ही योजना स्वत: राबविता येणार आहे. त्यासाठीच या योजनेच्या मूळच्या नावाचा विस्तार करून त्यामध्ये सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.केंद्रपुरस्कृत असणारी ही योजना आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम या नावाने ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. आता राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत योजना म्हणून ती राबविली जाणार आहे. पूर्वी वैयक्तिक लाभासाठीच या योजनेचा जास्त वापर होत होता.यासाठी १ घनमीटर ते ६ घनमीटर पर्यंतच्या बायोगॅस सयंत्राची बांधणी करण्यात येत होती. यासाठीच अनुदान दिले जात होते. या सयंत्राला जोडून शौचालय बांधले तर त्यासही अनुदान देण्याची पद्धत आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी बायोगॅसला व शौचालयाला अनुक्रमे ५५०० व १२०० रुपये असे मिळून ६७०० रुपये अनुदान दिले जात होते, तर मागासवर्गीयांसाठी (अनुसूचित जाती) ७००० व १२०० रुपये दिले जायचे. यामध्ये आता वाढ झाली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ७५०० व १६०० असे ९१०० रुपये देण्यात येणार आहेत, तर मागासवर्गीयांसाठी १०,००० व १६०० असे ११,६०० रुपये अनुदान बायोगॅस व शौचालयासाठी दिले जाणार आहे. तसेच २५ घनमीटरसाठी २९,६०० रुपये अनुदान दिले जाणारआहे.१ स्वयंपाकाकरिता शुद्ध इंधन, इतर औष्णिक तसेच विजेच्या वापराकरिता अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणे तसेच सेंद्रिय खतावर आधारित सुधारित सेंद्रिय खत पद्धतीचा अवलंब करून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे या दृष्टीने ही योजना राबविली जाते.२ ग्रामीण भागात पशुधन जास्त असल्याने ही योजना प्रभावीपणे येथेच जास्त प्रमाणात राबविली जात आहे. २५ घनमीटरपर्यंत अनुदान वाढविल्याने निमशहरी भागातही योजनेचा लाभ होणार आहे. घनकचऱ्याचा वापर येथे आता होऊ शकतो. बाजार भरतो तेथे याचा अधिक उपयोग होईल.३ अनुदानात वाढ होऊन ते २० हजार रुपये करावे अशी मागणी कोल्हापूर जिल्हा परिषदेने केली होती; पण तेवढी झाली नाही. वास्तविक वाढ झाल्यास संपूर्ण राज्यात योजना चांगली राबविली जाईल. वाळू, सिमेंट, मजुरी यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे सयंत्र शौचालय उभारण्यासाठी सुमारे ५० हजार रुपये खर्च होतो. त्यामुळे आणखीन अनुदान वाढ होणे गरजेचे आहे.