शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

ग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने तीन हजार उमेदवारी अर्ज सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 20:32 IST

Grampanchyat Elecation Kolhpaur- सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक संख्या कागल तालु्क्याची असून, करवीरसह सर्वच तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांची झुंबड उडाली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायतींसाठी ईर्ष्येने तीन हजार उमेदवारी अर्ज सादर ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज भरण्यासाठी झुंबड

कोल्हापूर : सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी विक्रमी तीन हजार ३७ इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात सर्वाधिक संख्या कागल तालु्क्याची असून, करवीरसह सर्वच तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांची झुंबड उडाली होती.कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुुरू असून, ३० तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी २६, गुरुवारी ५०० अर्ज आले; मात्र शुक्रवारी ख्रिसमस, त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुकांची व समर्थकांची झुंबड उडाली होती. इच्छुकांसोबत त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक असा गोतावळा आला होता.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी दोन हजार ९५३ व्यक्तींनी तीन हजार ३७ अर्ज भरले. अशारीतीने तीन दिवसांत तीन हजार ४६९ इच्छुकांनी तीन हजार ५६३ अर्ज भरले आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर