शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पेठवडगावात रस्त्यांचे ‘तीन तेरा’

By admin | Updated: August 8, 2016 23:36 IST

पावसामुळे दुरवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वाहनधारकांची गैरसोय

पेठवडगाव : शहरात पावसामुळे खराब रस्ते झाले आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती पालिकेने, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शहरातून आंतरराज्य मार्ग, तसेच जिल्हामार्ग जातो. तसेच वडगाव ही व्यापारी पेठ असल्यामुळे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मुसळधार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालिका चौकामध्ये ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ अशी अवस्था झाली आहे. येथील काही हातगाडे व्यावसायिक रस्त्यांमध्येच पाणी ओततात. त्यामुळे हा रस्ता थोडाफार खराब झाला होता. त्यातच पावसामुळे अधिकच भर पडली. पालिका चौक ते विजयसिंह यादव चौक, बिरदेव चौक ते हनुमान रोड, अंबा रोड, भादोले रोड या रस्त्यांची तर दुरवस्थाच झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचले आहे. या खड्ड्यांतून वाहने गेल्यास नागरिकांच्या अंगावर पाणी उडत आहे. यातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते शेतकरी संघापर्यंतचा रस्ता हा कायमस्वरूपी दुरवस्थेच्या गर्तेत सापडला आहे. तर अंबा रोड, हनुमान रोड या रस्त्यांवर पालिकेने जलवाहिनी टाकल्यामुळे या रस्त्यांची अधिकच दुरवस्था झाली आहे. तसेच पालिकेच्या जलवाहिन्यांतून वारंवार गळती होते. पालिकेने गळती वेळेत न काढल्यामुळे पाणी रस्त्यांवरच साचून राहते. शहरातील रस्त्यांची अनेकवेळा खुदाई करण्यात येते. या कारणांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. तर उपनगरांत नवीन जलवाहिन्या टाकल्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट आहे. नागरिकांना ये-जा करताना त्रासाचे होत आहे. परिणामी, महिला व लहान मुले घसरून पडत आहेत. वडगाव ते टोप संभापूर रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे आहेत. दोन्ही बाजूला खड्डे असल्यामुळे दुचाकीस्वार खड्डे चुकविण्यासाठी मधूनच गाडी चालवितात. तशीच अवस्था वाठार नाका ते वाठार रस्त्यांची झाली आहे. वडगाव ते लाटवडे, वडगाव ते मिणचे, वडगाव ते तासगाव हे रस्ते खराब झाले आहेत. याकडे पालिका, सार्वजनिक बांधकाम खाते यांनी लक्ष देण्याची गरज आहे. हद्दीचे त्रांगडे ४वडगाव शहरातील काही रस्ते पालिकेच्या, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे आहेत. शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर पालिकेच्या जलवाहिन्या आहेत. यामुळे हे रस्ते खराब झाल्यास दुरुस्तीबाबत सार्वजनिक विभाग उदासीन असतो. ४सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते आम्ही दुरुस्त का करू, अशी पालिकेची भूमिका असते. या दोघांच्या अप्रत्यक्ष वादाचा फटका नागरिकांना बसतो.