शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मारहाणीत बोंद्रेनगरमधील तरुणाचा मृत्यू- तिघांना अटक : खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 22:19 IST

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड, बोंद्रेनगर येथे दोन दिवसांपूर्वी चौघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला.

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड, बोंद्रेनगर येथे दोन दिवसांपूर्वी चौघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला. उदय खंडू सुतार (वय २४, रा. मातंग वसाहत, बोंद्रेनगर) असे त्याचे नाव आहे. संतप्त नागरिकांनी करवीर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली; तर एका विधिसंघर्ष मुलाला ताब्यात घेतले. संशयित आरोपी बाबूराव बबन देवणे (२८), बबन सिंधू गावडे (३२), राहुल बाबू कात्रट (२७ ,सर्व रा. बोंद्रेनगर) अशी त्यांची नावे आहेत.

उदय सुतार याच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. घरी तो आई, पत्नी यांच्यासोबत राहत होता. मिळेल तिथे मजुरीची कामे करीत असे. त्याची पत्नी चार दिवसांपूर्वी माहेरी कनाननगर येथे गेल्याने घरी तो व आई असे दोघेच होते. बुधवारी (दि. ११) रात्री बोंद्रेनगर बसस्टॉपवर त्याची चंदू ऊर्फ चंद्या नावाच्या तरुणाशी दारूवरून वादावादी झाली. यावेळी चंदूने साथीदार बाबूराव देवणे, बबन गावडे, राहुल कात्रट यांना बोलावून घेतले. त्यांनी उदयला बेदम मारहाण केली. तो दारूच्या नशेत असल्याने रस्त्यावर पडून राहिला. काही वेळाने त्याचा मित्र प्रवीण वायदंडे या ठिकाणी आला. त्याला उदय पडलेला दिसताच त्याने त्याला उठवून घरी सोडले. त्यानंतर जेवण करून पुन्हा तो बोंद्रेनगर स्टॉपवर आला. या ठिकाणी उलट्या होऊ लागल्याने प्रवीण व त्याच्या आईने त्याला घरी नेले. गुरुवारी (दि. १२) पहाटे त्याची प्रकृती बिघडल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना तो बेशुद्ध पडला. करवीर पोलीस चौकशीसाठी गेले असता त्याच्या आईने त्याला मारहाण झाल्याचे सांगितले. कोणी मारहाण केली हे माहीत नव्हते. पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता ‘उदयने बुधवारी रात्री मला फोन करून धनगरवाड्यातील तरुणांनी मारहाण केली आहे. मी आज येत नाही, उद्या येतो, असा निरोप दिला होता असे सांगितले. डॉक्टरांशी चर्चा केली असता मेंदूत रक्तस्राव झाला असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी उदयचा मित्र प्रवीण याच्याकडून मारहाण करणाºया तरुणांची नावे निष्पन्न केली. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा दाखल केला.दरम्यान, ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी उदयचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी मातंग वसाहतीमध्ये समजताच येथील दीडशे पुरुष-महिला सीपीआरमध्ये आले. तेथून त्यांनी करवीर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. याठिकाणी विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांच्यासह साथीदारांना अटक करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी पोलीस निरीक्षक जाधव यांच्याकडे केली.

नागरिकांचा संताप पाहून पोलिसांनी तिघांना अटक केली. तर विधिसंघर्ष मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.रिंकू देसाई यांच्याकडे चौकशी करणार रिंकू देसाई हे बोंद्रेनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या साथीदारांनी उदयला मारहाण केली आहे. देसाई हे आरोपींना पाठीशी घालतात. याच संशयितांनी आठ दिवसांपूर्वी आणखी एका तरुणाला मारहाण केली होती. ‘देसाई हे चिथावणी देतात; त्यांना अटक करा’ अशा मागणीचे लेखी निवेदन तेथील नागरिकांनी पोलीस निरीक्षक जाधव यांना दिले. त्यानुसार या प्रकरणी देसाई यांच्याकडे चौकशी करणार असल्याचे निरीक्षक जाधव यांनी सांगितले.