शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

‘चित्री’च्या वसाहतीसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -चित्री प्रकल्पातंर्गत येणाऱ्या रायवाडा आवंढी व चित्रानगर य वसाहतींचे स्वतंत्र ग्रामपंचायतींमध्ये रूपांतर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, १५ आॅगस्ट २०१५ रोजी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झेंडा फडकवण्याबरोबरच वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.अपुऱ्या लोकसंख्येच्या निकषाचे कारण पुढे करून प्रकल्पग्रस्तांच्या या वसाहती लगतच्या ग्रामपंचायतींना जोडण्यात आल्या होत्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व कॉ. संपत देसाई यांनी याला प्रचंड विरोध करीत राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता एक हजार लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून ३५० लोकसंख्येकरिता प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या मागणीवर ठाम राहत गुढी आंदोलन उभारले होते.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना दर्जा देण्याबाबत निर्णय झाला; पण पुढील प्रक्रिया थांबली होती. गेले महिनाभर पुन्हा ‘श्रमुद’ने कार्यवाहीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्री, आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर बैठका सुरू होत्या. प्रकल्पग्रस्तांची गावठाणे मंजूर झाली; परंतु महसूल गाव रूपांतरण प्रक्रिया थांबली होती. अखेर या बैठकांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये चित्री प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावठाण्यांना प्राधान्य देण्याचेही ठरले आहे. यामुळे आवंढी व चित्रानगर गावठाणांचे स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये रूपांतरण करण्यास काहीच अडचण राहिलेली नाही. शिवाय रायवाड्याचीही स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे. गुलामगिरी संपुष्टात : देसाईप्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा नसल्याने या वसाहतींवर एखादा राजकीय गट अथवा पक्ष आपले वर्चस्व ठेवू पाहत असे; परंतु या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्टात येणार असल्याचे कॉ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले.