शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

‘चित्री’च्या वसाहतीसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती

By admin | Updated: May 15, 2015 23:37 IST

वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -चित्री प्रकल्पातंर्गत येणाऱ्या रायवाडा आवंढी व चित्रानगर य वसाहतींचे स्वतंत्र ग्रामपंचायतींमध्ये रूपांतर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, १५ आॅगस्ट २०१५ रोजी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झेंडा फडकवण्याबरोबरच वसाहतींमधील प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्ठात येण्याचा मार्ग खुला झाला आहे.अपुऱ्या लोकसंख्येच्या निकषाचे कारण पुढे करून प्रकल्पग्रस्तांच्या या वसाहती लगतच्या ग्रामपंचायतींना जोडण्यात आल्या होत्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर व कॉ. संपत देसाई यांनी याला प्रचंड विरोध करीत राज्यभरातील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता एक हजार लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून ३५० लोकसंख्येकरिता प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींकरिता स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या मागणीवर ठाम राहत गुढी आंदोलन उभारले होते.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींना दर्जा देण्याबाबत निर्णय झाला; पण पुढील प्रक्रिया थांबली होती. गेले महिनाभर पुन्हा ‘श्रमुद’ने कार्यवाहीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्री, आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या पातळीवर बैठका सुरू होत्या. प्रकल्पग्रस्तांची गावठाणे मंजूर झाली; परंतु महसूल गाव रूपांतरण प्रक्रिया थांबली होती. अखेर या बैठकांमध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामध्ये चित्री प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावठाण्यांना प्राधान्य देण्याचेही ठरले आहे. यामुळे आवंढी व चित्रानगर गावठाणांचे स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये रूपांतरण करण्यास काहीच अडचण राहिलेली नाही. शिवाय रायवाड्याचीही स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे. गुलामगिरी संपुष्टात : देसाईप्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा नसल्याने या वसाहतींवर एखादा राजकीय गट अथवा पक्ष आपले वर्चस्व ठेवू पाहत असे; परंतु या वसाहतींना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांची राजकीय गुलामगिरी संपुष्टात येणार असल्याचे कॉ. संपत देसाई यांनी स्पष्ट केले.