शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

साडेतीन लाख जणांची रोज विषाची परीक्षा

By admin | Updated: December 21, 2015 00:37 IST

पंचगंगा प्रदूषण : नदीकाठच्या गावांना धोका; साथीच्या रोगांनी नागरिक हैराण

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाने उच्चतम पातळी गाठल्यामुळे नदीचे पात्र नाला बनण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास गांधीनगर ते नृसिंहवाडी या टप्प्यातील नदीकाठच्या २६ गावांतील पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे. याची झळ सध्या या गावांना बसत असून, अशीच परिस्थिती राहिल्यास या गावांना सुजलाम, सुफलाम् बनविणारी हीच पंचगंगा या गावातील सुमारे साडेतीन लाख लोकांचा कर्दनकाळ ठरेल. पंचगंगेच्या प्रदूषणाचा व उपाययोजनांचा वेध घेणारी मालिका आजपासून...अतुल आंबी ल्ल इचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्यात शहरीकरण व औद्योगिकीकरण जसे वाढत गेले, तसे मैलायुक्त सांडपाणी व रासायनिकयुक्त विषारी पाणी नाल्यांच्या माध्यमातून पंचगंगा नदीमध्ये थेट मिसळले जाऊ लागले. सुरुवातीला याची तीव्रता लक्षात न आल्याने उपाययोजनांकडे सर्वच पातळीवर डोळेझाक करण्यात आली. त्यात पंचगंगेला बारमाही स्वच्छ व शुद्ध पाणी असल्याने, तसेच जलचर प्राणी व वनस्पती यांचे मोठे प्रमाण असल्याने या दूषित पाण्याचा एवढा प्रादुर्भाव जाणवत नव्हता. त्यात राधानगरी धरणातून एक-दोन वेळा पाणी सोडल्यास हे प्रदूषण कमी व्हायचे व होणारी टीकाही थांबत होती. मात्र, आता पंचगंगा प्रदूषणाचे अक्राळविक्राळ रूप समोर येत आहे. मैलायुक्त सांडपाणी व कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाणी रोखण्यात केलेल्या जुजबी यंत्रणा उघड्या पडल्या आहेत. प्रदूषणामुळे जलचर प्राण्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, तर गांधीनगर ते नृसिंहवाडी या नदीकाठच्या परिसरातील २६ गावांचे तीन लाख ४८ हजार ९४६ लोक हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. दोन लाख ९२ हजार लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहरालाही काहीवेळा या नदीतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. त्यामुळे साथींच्या रोगांनी या गावांना आपला विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. (क्रमश:)सांडपाणी रोखण्यासाठी केलेल्या जुजबी यंत्रणा उघड्या पडल्या मैलायुक्त व रसायनयुक्त सांडपाणी थेट नदीतइचलकरंजीतील तीन लाख लोकांनाही काहीवेळा केला जातो पंचगंगेतून पाणीपुरवठाअनेक गावे पितात विनाप्रक्रिया पाणीपंचगंगा नदीच्या प्रदूषणास शहरे मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. मात्र, शहरात पाणी शुद्धिकरण प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा केला जातो आणि नदीकाठच्या अनेक गावांना मात्र विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. त्यामुळे या गावांमध्ये दूषित पाण्यापासून होणारे अनेक आजार ग्रामस्थांना जखडलेले असतात. याउलट शहराच्या तुलनेत या गावांमध्ये शासनाच्या आरोग्य सेवाही तोकड्या स्वरूपाच्याच आहेत.नदीकाठची गावे हातकणंगले, हालोंडी, हेर्ले, माणगाव, रुकडी, साजणी, तिळवणी, पुलाची शिरोली, चिंचवाड, पट्टणकोडोली, गांधीनगर, रुई, कबनूर, चंदूर, अब्दुललाट, रांगोळी, इंगळी, शिरदवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी, शिरढोण, धरणगुत्ती, नांदणी, हरोली, आगर, हेरवाड या गावांचा समावेश आहे; तर इचलकरंजी शहरालाही काहीवेळा या नदीतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. इचलकरंजीची लोकसंख्या दोन लाख ९२ हजार आहे. म्हणजेच गांधीनगर ते नृसिंहवाडी या मार्गावरील सुमारे साडेसहा लाख लोकांना पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. ६७ किलोमीटरचा प्रवासपंचगंगा नदीचा उगम प्रयाग चिखली याठिकाणी झाला आहे. तेथून ६७ किलोमीटरचा प्रवास करत ही नदी नृसिंहवाडी या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते. या नदीमध्ये कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि धामणी या पाच नद्यांचा समावेश आहे. अनादी कालापासून पाच नद्यांचा समावेश असलेल्या या पंचगंगा नदीतील पाणी काठावरील गावे पित आहेत. मात्र, सध्या नदीचे पाणी पिण्याचे सोडाच, ते अंघोळीच्याही लायकीचे राहिलेले नाही. एकीकडे डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या विरोधी कायदा करून शासन यावर पर्याय उपलब्ध करीत आहे. मात्र, नदीकाठच्या गावातील लोकांना मैलामिश्रित पाणी प्यावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.