शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

स्वच्छतेसाठी एकवटले हजारो हात

By admin | Updated: February 6, 2015 00:46 IST

उत्तूरमध्ये सुंदर गल्ली स्पर्धा : विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला ग्रामस्थांचाही हातभार

रवींद्र येसादे -उत्तूर -‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीप्रमाणे ‘स्वच्छ सुंदर माझा गाव’ हे अभियान शाळकरी मुलांनी राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शाळकरी मुलांबरोबर ग्रामस्थांनीही हिरीरीने पुढाकार घेऊन बेचाळीस गल्ल्यांची स्वच्छता केली. उत्तूर (ता. आजरा) या दहा हजार लोकवस्तीच्या गावानं जिल्ह्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला. सर्व शाळांनी स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरला. ग्रामपंचायतीने सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. तीन बुधवारनंतर स्वच्छतेचा पहिला ठप्पा यशस्वी पार पडला.प्रत्येक मंगळवारी सायंकाळी विद्यार्थ्यांबरोबर पालकही आपली गल्ली स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. तिसऱ्या परीक्षणात बेचाळीस गल्ल्या स्वच्छ झाल्या. परीक्षण होईपर्यंत साऱ्यांचे लक्ष स्वच्छता मोहिमेकडे होते. प्रत्येक गल्लीत वेगळेपण करण्याचा प्रयत्न केला जात होता. परीक्षण होईपर्यंत शाळकरी मुलांनी गल्लीतील मार्ग बंद केले होते. परीक्षणाबाबत पालक-विद्यार्थी यांच्यात उत्सुकता होती.परीक्षणाच्या दरम्यान स्वच्छ सुंदर परिसराबाबत घोषवाक्ये, ओला सुका कचऱ्यासाठी पेटी, वृक्षारोपण, वृत्तपत्रे, पाणपोई, अंधश्रद्धा निर्मूलन, उद्बोधनपर वाक्ये, प्लास्टिक हटाव, पक्षी वाचवण्यासाठी घरटे आदींसह गल्लीत सारवण करून रांगोळी घातली होती.प्लास्टिकमुक्तीसाठी ग्रामपंचायत आणि व्यापारी यांची बैठक घेणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यावर स्वच्छतेचे नियोजन नाही. गटारींची अपवादात्मक गल्ल्यांनी स्वच्छता केली नाही. तेथे जनजागृती केली पाहिजे, अशा काही त्रुटीही परीक्षणांच्या वेळी निदर्शनास आणून दिल्या आहेत. या त्रुटींचेही निराकरण करण्यात येणार आहे.संपूर्ण गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला ग्रामस्थानींही दिलेली दाद वाखाणण्यासारखी आहे. यामध्ये सातत्य ठेवण्याचा निर्धार यानिमित्ताने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केला आहे.