शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कोल्हापुरातून पळून गेलेल्यांनी उद्धव ठाकरेंवर बोलू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापुरातील एकाही विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार नाही, म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापुरातील एकाही विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार नाही, म्हणूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्याला पळून गेले. अशा व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलू नये, अशी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. कोरोनामुळे ५५ हजार बालके बाधित झाली, अशा परिस्थितीत भाजपच्या मंडळींनी राजकारण थांबवावे, असेही त्यांनी म्हटले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आजारपणावर भाजपचे मीडिया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदाल यांनी भाष्य करीत आजारपणाला वाझे प्रकरणाशी जोडले होते, त्याबाबत जिंदाल यांनी माफी मागावी, अशी आपण मागणी केली होती. माफी राहिली बाजूलाच चंद्रकांत पाटील हे जिंदाल काय चुकीचे बोलले असे समर्थन करीत आहेत. त्यांना इतकी घमेंड कोठून आली? ते अतिशय भित्रे आहेत, कोल्हापुरातील एकाही विधानसभेच्या जागेवर उभारण्याची त्यांची ताकद नसल्यानेच ते पुण्याला पळून गेले. अशांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सारख्या प्रामाणिक व्यक्तीवर बोलणे योग्य नाही.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. राज्यात ५५ हजार बालके बाधित झाली आहेत. राजकारण किती करायचं? याला काही मर्यादा आहे की नाही.

देवेंद्र फडणवीस की चंद्रकांत पाटील असोत, सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. सरकार अस्थिर करण्याचा कितीही प्रयत्न करू देत, कसलेही व काहीही आरोप करू देत, महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे चालणार आहे. अशा घटनांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.