शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मला संयमचा सल्ला देणाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ताकद लावावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST

कोल्हापूर : पूर ओसरून सव्वा महिना झाला तरी अजूनही भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तातडीच्या आर्थिक मदतीचाही पत्ता नाही. यामुळे ...

कोल्हापूर : पूर ओसरून सव्वा महिना झाला तरी अजूनही भरपाईची रक्कम मिळालेली नाही. तातडीच्या आर्थिक मदतीचाही पत्ता नाही. यामुळे पूरग्रस्तांचा संयम सुटला आहे. यामुळे माझ्यासह पूरग्रस्तांना संयमचा सल्ला देणाऱ्या जिल्ह्यातील मंंत्र्यांनी आपली राजकीय ताकद वापरून सरकारकडून पूरग्रस्तांना भरीव मदत मिळवून द्यावी, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनी हा सल्ला दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पदयात्रा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथून निघाली. या वेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, सन २००५, २००६, २०१९ मध्ये तातडीची आर्थिक मदत वेळेत मिळाली होती. आता पूरग्रस्तांना कपडे, भांडी खरेदीसाठीची रक्कमही अजून मिळालेली नाही. पूरग्रस्त सरकारकडे सूर्य, चंद्र मागत नाहीत. झालेल्या नुकसानीची भरपाई मागत आहेत. मंत्र्यांची दालने सजवण्यासाठी आणि साखर कारखान्यांची तीन हजार कोटींची थकबाकी माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत. पण पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी का पैसे नाहीत? राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी, पूरग्रस्तांची चेष्टा करीत आहे. म्हणून आत्मक्लेष करण्यासाठी पदयात्रा निघाली काढली आहे. आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. पूरग्रस्तांचे जगणं मुश्कील झाल्याने पदयात्रेने जाऊन ५ सप्टेंबरला नृसिंहवाडीत जलसमाधी आंदोलन होईल.

या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिदंर पाटील, माजी जि. प. सदस्य सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर यांच्यासह विविध पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट

जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल, खूर्च्या

आंबेवाडी, प्रयाग चिखली पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी भूखंड दिल्याचे प्रशासन सांगत आहेत. पण यातील अनेक जणांच्या नावे दीर्घ काळानंतरही भूखंड झालेले नाहीत. भूखंड नावावर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आंदेालन करू. एक तर भूखंड नावावर करून घेऊ नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्च्या तरी घेऊ येऊ. असे आंदोलन पदयात्रेनंतर करू, असे आश्वासन माजी खासदार शेट्टी यांनी दिले.

खात्यावर वर्ग तर मग

सानुग्रह अनुदान देण्यासाठी १७ कोटी रुपये आले आहेत. ते पात्र पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्ग केले जात असल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात पूरग्रस्तांना रक्कम मिळालेली नाही. मग वर्ग केलेले पैसे कोठे जात आहेत? केंद्रीय आपत्ती निवारण निधीतूनही मदत मिळण्यास विलंब होत आहे. ही मदत केवळ गुजरातसाठीच आहे का? असाही प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला.