शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांना माणूस म्हणून समाजमान्यता नाही-‘संवेदना’ मेळाव्यात व्यक्त झाली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:25 IST

तृतीयपंथीयांना लग्न करावेसे वाटते; परंतु त्यांना कायद्याने तशी तरतूद नाही. ती मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना ‘थर्ड जेंडर’ म्हणून मान्यता दिली आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून, मानवी हक्कांचे जतन करणारा आहे. त्यामुळे आता सर्व शासकीय, अशासकीय आणि खासगी व्यवस्थापनांत ‘लिंग’ या शब्दासमोर स्त्री / पुरुष याबरोबरच ‘इतर’ हा पर्याय लिहिणे बंधनकारक आहे; पण या निर्णयाची अंमलबजावणी केवळ दोन-तीन टक्के आहे. कायद्याची मान्यता मिळाली तरी अजूनही तृतीयपंथीयांना माणूस म्हणून समाजमान्यता नाही आणि शासनाची मान्यताही नाही, अशी खंत ‘संवेदना’ मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिनानिमित्त अनगोळ फौंडेशन, आत्मसहाय्य सामाजिक संस्था, नवखुषी फौंडेशनतर्फे ‘संवेदना’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात रविवारी दुपारी हा मेळावा झाला. अनगोळ फौंडेशनच्या सचिव साधना झाडबुके म्हणाल्या, तृतीयपंथीयांमध्ये मातृत्वाची भावना दिसते; परंतु त्यांना कोणीही मूल दत्तक किंवा प्रतिपालकत्वासाठी देत नाहीत. कायद्यामध्ये तसा उल्लेख नाही. तृतीयपंथीयांना लग्न करावेसे वाटते; परंतु त्यांना कायद्याने तशी तरतूद नाही. ती मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.

मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयूरी आळवेकर म्हणाल्या, शासनाच्या अनेक योजना केवळ स्त्री-पुरुषांसाठी असून, तेथेदेखील तृतीयपंथीयांचा विचार केला गेलेला नाही. सामाजिक न्यायाच्या अनेक योजना असल्या, तरी व सर्व दृष्टींनी तृतीयपंथी या योजनेस पात्र असले, तरी या तृतीयपंथीयांना अनुदान व पेन्शन मंजूर करताना त्यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये (स्त्री / पुरुष) घालायचे, हा प्रश्न अधिकाऱ्यांना असल्याने व ती संवेदनशीलता अधिकाऱ्यांत नसल्याने तृतीयपंथीय शासनाच्या सर्वच योजनांपासून वंचित राहतात. यासाठी शासनपातळीवर गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

याप्रसंगी प्रिया कुलकर्णी, स्मिता वदन, रोहिणी कांबळे, नवखुषी फौंडेशनच्या हुस्ना शेख यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नवखुषी फौंडेशनच्या अध्यक्ष वैशाली देसाई यांनी फौंडेशनच्या वतीने साडी वाटप केले. याप्रसंगी आत्मसहाय्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जाधव यांनी प्रास्ताविक केले.आत्मसहाय्य सामाजिक संस्थेचे सचिव अशोक पोतनीस यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य उपस्थित होते.ओळखपत्र द्या...तृतीयपंथीयांना शासनाने ओळखपत्र देऊन त्यांचा विकास घडवून आणणे आवश्यक आहे. त्यांना आरोग्य, शिक्षण, मतदान, निवडणूक हक्क, वारसा हक्क, पालकत्वाचा हक्क व मूल दत्तक घेण्याचा हक्क, आदी अधिकार देण्याबाबत मागणी करून याबाबत यावेळी सविस्तर चर्चा केली. कोल्हापुरातील चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय दिनानिमित्त अनगोळ फौंडेशन, आत्मसहाय्य सामाजिक संस्था, नवखुषी फौंडेशनतर्फे आयोजित संवेदना मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना मयूरी आळवेकर. शेजारी वैशाली देसाई, मनीषा कापडे, साधना झाडबुके, प्रिया कुलकर्णी, स्मिता वदन उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार) 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर