शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

प्रस्थापित राजकीय पक्षांना तिसरा पर्याय

By admin | Updated: November 20, 2015 00:26 IST

लक्ष्मण मानेंची माहिती : ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ला आयोगाची मान्यता

कोल्हापूर : सध्याच्या राजकीय पक्षांना कोणतीही विचारसरणी राहिलेली नाही. त्यांची धोरणे एकसारखी आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारी आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्थापित राजकीय पक्षांना आता ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ या पक्षाद्वारे तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पक्षाला भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष माने म्हणाले, देशातील सध्याचे राजकीय पक्ष हे एकसारखेपणाने कार्यरत आहेत. त्यांना पर्याय म्हणून आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ कार्यरत राहील. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ही या पक्षाची मूल्ये आहेत. एस.टी. बचाव, डोनेशनशिवाय शिक्षण, शेती बचाव आणि जाती हटाव अशी त्रिसूत्री घेऊन आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत. यात एस. टी. बचावसाठी नागरिकांना पहिल्यांदा एस.टी.तून प्रवास करण्याची विनंती केली जाईल. सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे यासाठी डोनेशनला विरोध करण्यात येईल. खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण उधळून लावणे; तसेच समाजवादी समाजरचनेसाठी आग्रही उपक्रम राबविले जातील. जातिअंताची लढाई बळकट केली जाणार आहे. आमचा पक्ष भारतीय नागरिकांचा आहे. यात जात, धर्म, पंथ, लिंग असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पहिल्या टप्प्यात आंदोलन आणि सभासद नोंदणी हाती घेतली जाणार असून, लवकरच त्याची सुरुवात केली जाईल. या पत्रकार परिषदेस पक्षाचे उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, जगन्नाथ जाधव, सज्जनसिंह चितोडिया, विलास तमाईचीकर, समशेरसिंह कलानी, पप्पूसिंग चितोडिया उपस्थित होते. (प्रतिनिधी)पक्षाचे काम अधिकृतपणे सुरू होणार सन २०१४ मध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पुण्यात ‘इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन काँग्रेस’ पक्षाची स्थापना केली. मात्र, पक्षाची नोंदणी झाली नसल्याने त्याची अधिकृतपणे सूचना केली नव्हती. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबरला पक्षाला मान्यता दिली आहे. त्यानुसार आता पक्षाचे अधिकृतपणे काम सुरू होणार आहे.