शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर राज्यात तृतीय

By admin | Updated: May 28, 2015 01:12 IST

टक्का वाढला : बारावीचा विभागात उच्चांकी निकाल; मुलींची आघाडी कायम

कोल्हापूर : करिअर निश्चितीतील महत्त्वाचा टप्पा असलेला बारावीचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा यावर्षीचा निकाल ९२.१३ टक्के लागला. कोल्हापूर विभागात ९२.६४ टक्क्यांसह सातारा जिल्हा अव्वल ठरला. सांगलीने ९२.२८ टक्क्यांसह द्वितीय आणि गेल्यावर्षी विभागात प्रथम असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची घसरण होऊन ९१.६४ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कोल्हापूर विभागाच्या निकालात ०.५९ टक्के वाढ झाली आहे. टक्का वाढूनही विभाग राज्यात गेल्यावर्षीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव शरद गोसावी व शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी बुधवारी दुपारी एक वाजता येथे पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी शिक्षणाधिकारी डी. बी. कुलाल, सहसचिव पी. डी. भंडारे, सहाय्यक सचिव बी. एस. रोटे, आदी उपस्थित होते.कोल्हापूर विभागातून ७०२ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ६ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेसाठी एकूण ६४ हजार ५३० मुले, तर ५१ हजार २०७ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७ हजार ३३४ असून, त्यांचे प्रमाण ८८.८५ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९ हजार २९७ असून, त्यांचे प्रमाण ९६.२७ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने ७.४२ टक्के इतके अधिक आहे. सलग चौथ्यावर्षी मुलींची उत्तीर्णतेच्या प्रमाणात सरशी राहिली आहे. सातारा जिल्ह्यातील २१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३५ हजार ९९८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३ हजार ३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.६४ टक्के आहे. सांगली जिल्ह्यातील २२८ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३२ हजार ४८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९२.२८ टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून २५७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ६४ हजार ५३० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५७ हजार ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८५ टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात गुरुवारी (दि. ४ जून) दुपारी तीन वाजता गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. (प्रतिनिधी)