शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर आला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्या प्रमाणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्या प्रमाणात नागरिकांचे पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण मात्र कमी होत असून ही एक दिलासादायक बाब आहे. सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर हा कमी आला आहे. १६ जून २०२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा १६.२१ टक्के इतका होता. तो २२ जून रोजी ४.६९ टक्क्यांवर आला आहे. मात्र मृतांची संख्या कमी करणे हे प्रशासनासमोरचे एक आव्हान बनले आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ही नेहमी वाढतीच राहिली आहे. मे महिन्यात ५० हजारावर नागरिकांना कोरोना लागण झाली होती. त्याच पध्दतीने गेल्या २० दिवसात २७ हजाराहून अधिक जणांना कोरोना झाला आहे. परंतू १४ जून २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर मात्र प्रशासनानेही कठोर भूमिका घेत कोरोना नियंत्रणाबाबत आखणी केली आहे.

उपमुख्यमंत्री पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत चाचण्या वाढवा आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सक्त सूचना पवार यांनी केल्या होत्या. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्याने चाचण्या वाढवून संसर्ग रोखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

यानंतर जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून ॲंटिजन चाचण्यांचे किट मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आले असून शहरासह जिल्ह्यात या चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. अधिक संख्येने चाचण्यात होत असतानाही तुलनेत कमी प्रमाणात नागरिक पॉझिटिव्ह येत असल्याने सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर हा कमी आला आहे.

चौकट

आठवड्यातील पॉझिटिव्हिटी दर

दिनांक पॉझिटिव्हिटी दर टक्के

१६ जून १६.२१

१७ जून १२.८५

१८ जून १०.९

१९ जून १०.७८

२० जून १०.३७

२१ जून ६.६१

२२ जून ४.६९

चौकट

आकडेवारी अद्ययावत करण्याच्या सूचना

देशभरातील कोरोना रुग्णांची सर्व आकडेवारी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वेबसाईटवर अद्ययावत करावी लागते. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये अनेक मोबाईल कंपन्यांची रेंज नसल्याने ही आकडेवारी वेळेत अद्ययावत करता येत नाही. याच आकडेवारीवर केंद्र आणि राज्य शासन निर्बंधाबाबत निर्णय घेत असल्याने ही आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे काही करून ही आकडेवारी अद्ययावत करा अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी केल्या आहेत. याच कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून रोज रात्री ८ वाजता प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हीसीव्दारे बैठक सुरू करण्यात आली आहे.