शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

‘ते’ मृतदेह चुलत बहीण-भावाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:15 IST

आंबोली : आंबोली-कावळेसाद येथील दरीत आढळलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-सावर्डे पाटणकर येथील श्रीधर सुरेश मोरे (वय २१) व त्याची चुलत बहीण नयना रमेश मोरे (१५) यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.मृत श्रीधर याच्या पँटच्या खिशात असलेल्या दुचाकीच्या चावीने, तर नयनाचा मृतदेह तिच्या ...

आंबोली : आंबोली-कावळेसाद येथील दरीत आढळलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-सावर्डे पाटणकर येथील श्रीधर सुरेश मोरे (वय २१) व त्याची चुलत बहीण नयना रमेश मोरे (१५) यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.मृत श्रीधर याच्या पँटच्या खिशात असलेल्या दुचाकीच्या चावीने, तर नयनाचा मृतदेह तिच्या अंगावरच्या कपड्याने ओळखण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यामागचे कारण आम्ही शोधून काढू, असे सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी सांगितले.आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथे गुरुवारी दोघांचे मृतदेह आढळून आले होते. ते मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता एक महिन्यापूर्वी कावळेसाद परिसरात पोलिसांना एक दुचाकी आढळून आली होती. ती दुचाकी राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील सुरेश मोरे याची होती. ती आंबोली पोलिसांनी मुरगूड पोलिसांकडे दिली होती. मात्र, दुचाकीवरून बेपत्ता असलेल्या श्रीधरचा तपास झाला नव्हता. श्रीधरबरोबरच नयना ही त्याची चुलत बहीण बेपत्ता होती. मात्र, शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह आंबोली-कावळेसाद येथील दरीतून बाहेर काढत असताना सांगेली येथील आपत्कालीन टिमला आणखी दोन मृतदेह दरीत असल्याचे आढळून आले होते. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी शोधमोहीम राबविली. त्यात या दोघांचेही मृतदेह आढळून आले. पोलिसांना यातील श्रीधरच्या पँटच्या खिशात दुचाकीची चावी आढळून आली. त्यावरून सावंतवाडी पोलिसांनी मुरगूड पोलिसांशी संपर्क केला असता सापडलेली दुचाकी ही सावर्डे येथील सुरेश मोरे यांची होती. त्यामुळे मिळालेला मृतदेह त्यांचा मुलगा श्रीधर यांचाच असावा, असा अंदाज बाळगला व शुक्रवारी मुरगूड पोलिसांसह त्यांच्या नातेवाइकांना सावंतवाडी येथे बोलावण्यातआले. शुक्रवारी त्यांचे नातेवाईक सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचे फोटो तसेच कपडे व दुचाकीची चावी पाहिली.त्यावरून हा श्रीधरचाच मृतदेह असल्याचे सांगितले, तर नयनाच्या अंगावर असलेले कपडे पाहून तिच्या नातेवाइकांनी हा नयनाचाच मृतदेह असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा रितसर पंचनामा केला व नातेवाइकांचेही जबाब नोंदवले.घरात बोलतील म्हणून जिवाचा शेवटश्रीधर व नयना हे तीन दिवस आंबोलीत राहिले. याची नोंद हॉटेलमध्ये आहे. भाऊ-बहीण असल्यानेच हॉटेलच्या मालकाने त्यांना ठेवले. मात्र, कावळेसाद पॉर्इंटवर ते फिरायला गेल्यानंतर आपण बरेच दिवस घरातून बाहेर असल्याने घरातील नातेवाइक ओरडतील, याच भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांचे नातेवाइक व्यक्त करीत आहेत. त्याला पोलिसांनीही दुजोरा दिला.ओळखीसाठी योग्य कारण दिल्याने ‘डीएनए’ नाहीश्रीधर व नयना यांच्या मृतदेहांच्या ओळखीबाबत योग्य कारण त्यांच्या नातेवाइकांनी दिल्यानेच आम्ही मृतदेहांची ‘डीएनए’ चाचणी करण्यासाठी पाठविले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. श्रीधर याच्या खिशात चावी, तर नयनाच्या कपड्यांवरून मृतदेह ओळखले. मृतदेहांचा सांगाडा शिल्लक होता; पण कपड्यावरून मृतदेह ओळखता येत होते, असेही पोलिसांनी सांगितले.श्रीधरचे दहावीपर्यंतचे शिक्षण आंबोलीतश्रीधर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण आंबोलीतील पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. त्यामुळे त्याला आंबोलीची माहिती होती. त्यातूनच तो फिरायला आला होता, पण त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याची माहिती घ्यावी लागेल, असेही पोलिसांनी सांगितले. आत्महत्या करणारे नात्याने भाऊ-बहीण होते. तसेच श्रीधर दहावीनंतर इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी बाहेर होता, असे पोलिसांनी सांगितले.अनोळखी दुचाकी, तरी शोधाशोध झाली नाहीश्रीधर याने दुचाकी कावळेसाद पॉर्इंट येथे लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते, पण दुचाकी मिळाल्यानंतरही कावळेसाद परिसरात मुरगूड पोलिसांनी शोधाशोध का केली नाही? फक्त ते दुचाकी घेऊन कसे काय गेले? याची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.