शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

‘ते’ मृतदेह चुलत बहीण-भावाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:15 IST

आंबोली : आंबोली-कावळेसाद येथील दरीत आढळलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-सावर्डे पाटणकर येथील श्रीधर सुरेश मोरे (वय २१) व त्याची चुलत बहीण नयना रमेश मोरे (१५) यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.मृत श्रीधर याच्या पँटच्या खिशात असलेल्या दुचाकीच्या चावीने, तर नयनाचा मृतदेह तिच्या ...

आंबोली : आंबोली-कावळेसाद येथील दरीत आढळलेल्या दोन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-सावर्डे पाटणकर येथील श्रीधर सुरेश मोरे (वय २१) व त्याची चुलत बहीण नयना रमेश मोरे (१५) यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.मृत श्रीधर याच्या पँटच्या खिशात असलेल्या दुचाकीच्या चावीने, तर नयनाचा मृतदेह तिच्या अंगावरच्या कपड्याने ओळखण्यात आला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यामागचे कारण आम्ही शोधून काढू, असे सावंतवाडीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी सांगितले.आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथे गुरुवारी दोघांचे मृतदेह आढळून आले होते. ते मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता एक महिन्यापूर्वी कावळेसाद परिसरात पोलिसांना एक दुचाकी आढळून आली होती. ती दुचाकी राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील सुरेश मोरे याची होती. ती आंबोली पोलिसांनी मुरगूड पोलिसांकडे दिली होती. मात्र, दुचाकीवरून बेपत्ता असलेल्या श्रीधरचा तपास झाला नव्हता. श्रीधरबरोबरच नयना ही त्याची चुलत बहीण बेपत्ता होती. मात्र, शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा मृतदेह आंबोली-कावळेसाद येथील दरीतून बाहेर काढत असताना सांगेली येथील आपत्कालीन टिमला आणखी दोन मृतदेह दरीत असल्याचे आढळून आले होते. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी शोधमोहीम राबविली. त्यात या दोघांचेही मृतदेह आढळून आले. पोलिसांना यातील श्रीधरच्या पँटच्या खिशात दुचाकीची चावी आढळून आली. त्यावरून सावंतवाडी पोलिसांनी मुरगूड पोलिसांशी संपर्क केला असता सापडलेली दुचाकी ही सावर्डे येथील सुरेश मोरे यांची होती. त्यामुळे मिळालेला मृतदेह त्यांचा मुलगा श्रीधर यांचाच असावा, असा अंदाज बाळगला व शुक्रवारी मुरगूड पोलिसांसह त्यांच्या नातेवाइकांना सावंतवाडी येथे बोलावण्यातआले. शुक्रवारी त्यांचे नातेवाईक सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचे फोटो तसेच कपडे व दुचाकीची चावी पाहिली.त्यावरून हा श्रीधरचाच मृतदेह असल्याचे सांगितले, तर नयनाच्या अंगावर असलेले कपडे पाहून तिच्या नातेवाइकांनी हा नयनाचाच मृतदेह असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा रितसर पंचनामा केला व नातेवाइकांचेही जबाब नोंदवले.घरात बोलतील म्हणून जिवाचा शेवटश्रीधर व नयना हे तीन दिवस आंबोलीत राहिले. याची नोंद हॉटेलमध्ये आहे. भाऊ-बहीण असल्यानेच हॉटेलच्या मालकाने त्यांना ठेवले. मात्र, कावळेसाद पॉर्इंटवर ते फिरायला गेल्यानंतर आपण बरेच दिवस घरातून बाहेर असल्याने घरातील नातेवाइक ओरडतील, याच भीतीने आत्महत्या केली असावी, असा अंदाज त्यांचे नातेवाइक व्यक्त करीत आहेत. त्याला पोलिसांनीही दुजोरा दिला.ओळखीसाठी योग्य कारण दिल्याने ‘डीएनए’ नाहीश्रीधर व नयना यांच्या मृतदेहांच्या ओळखीबाबत योग्य कारण त्यांच्या नातेवाइकांनी दिल्यानेच आम्ही मृतदेहांची ‘डीएनए’ चाचणी करण्यासाठी पाठविले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. श्रीधर याच्या खिशात चावी, तर नयनाच्या कपड्यांवरून मृतदेह ओळखले. मृतदेहांचा सांगाडा शिल्लक होता; पण कपड्यावरून मृतदेह ओळखता येत होते, असेही पोलिसांनी सांगितले.श्रीधरचे दहावीपर्यंतचे शिक्षण आंबोलीतश्रीधर याचे दहावीपर्यंतचे शिक्षण आंबोलीतील पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. त्यामुळे त्याला आंबोलीची माहिती होती. त्यातूनच तो फिरायला आला होता, पण त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याची माहिती घ्यावी लागेल, असेही पोलिसांनी सांगितले. आत्महत्या करणारे नात्याने भाऊ-बहीण होते. तसेच श्रीधर दहावीनंतर इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी बाहेर होता, असे पोलिसांनी सांगितले.अनोळखी दुचाकी, तरी शोधाशोध झाली नाहीश्रीधर याने दुचाकी कावळेसाद पॉर्इंट येथे लावून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते, पण दुचाकी मिळाल्यानंतरही कावळेसाद परिसरात मुरगूड पोलिसांनी शोधाशोध का केली नाही? फक्त ते दुचाकी घेऊन कसे काय गेले? याची ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे.