शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

या कवितांना मरण यावं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:15 IST

उदय कुलकर्णी काही काही कविता आणि गाणी जितकी लवकर कालबाह्य होतील तितकं चांगलं. एखादी कविता कालबाह्य होणं म्हणजे जणू ...

उदय कुलकर्णीकाही काही कविता आणि गाणी जितकी लवकर कालबाह्य होतील तितकं चांगलं. एखादी कविता कालबाह्य होणं म्हणजे जणू तिचं मरण.आपल्या कवितेला अमरत्व लाभावं असं अनेकांना वाटतं; पण विंंदा करंदीकरांसारखा कवी मात्र आपल्या एका कवितेला या देशात मरणच येत नाही, अशी सल मनात ठेवून हे जग सोडून गेला. १९५२ साली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंदांनी ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता लिहिली. कवितेच्या काही ओळी अशा होत्या,‘गोड गोड जुन्या थापा,(तुम्ही पेरा तुम्ही कापा)जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग,तुम्ही तरी काय करणार?, आम्ही तरी काय करणार?त्याच त्याच खड्ड्यांमधे, पुन्हा पुन्हा तोच पायजुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी.(जिकडे टक्के तिकडे टोळी),ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता!’लोकसभेची आताची निवडणूक ही सतरावी निवडणूक; पण १९५२ साली लिहिलेली ही कविता तितकीच ताजी असल्याचा अनुभव येतो आहे ना?मंगेश पाडगांवकर हे मराठीतील आणखी एक प्रख्यात कवी. त्यांनी ‘सलाम‘ ही कविता लिहिली. या उपहासात्मक कवितेला आजही टाळ्या मिळतात. ही कवितादेखील मरत नाही. पाडगांवकरांनी लिहिलं होतं,‘या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलामया देशाच्या सुउदात्त, सुमंगल, सुपरंपरेला सलामसर्व बिलंदर घोषणांना सलामजातिभेदाच्या उकीरड्यांना सलामया उकीरड्यांतून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलामनिवडणुकींना सलाम, निवडणूक फंडाला सलाममतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलामससा हाती असलेल्या पारध्यांना सलामत्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलामसलाम प्यारे भाईयों सबको सलाम!’रामदास फुटाणे हे विंंदा व पाडगांवकरांच्या नंतरच्या पिढीतले; पण त्यांची ‘भारत कधी कधी माझा देश आहे!’ ही कविता सुद्धा अमरत्वाच्या दिशेनं वाटचाल करीत असल्याचं प्रत्यंतर येतंय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांचं मतदान एव्हाना पार पडलं आहे. निवडणुकीत कोणाचे प्रचाराचे मुद्दे कोणते हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरते आहे. गेल्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या विरोधात होते त्याच पक्षाची उमेदवारी घेऊन अनेक उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. आपलं कोण आणि परकं कोण, हेच कळू नये अशी स्थिती आहे. सुबुद्ध मतदार त्यामुळं हतबुद्ध झालेला आहे. थेट पंतप्रधानही मागास जातीमुळं आपल्याला लक्ष्य बनवलं जातंय, यासारखे आरोप विरोधकांवर करताना दिसत आहेत. उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी कमीअधिक प्रमाणात ज्या त्या मतदारसंघातील विविध जातिधर्माचे मतदार किती, याचा विचार केला आहे. दुसरा महत्त्वाचा निकष, निवडून येण्याची कुवत म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची कुवत!गुलजार हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित. १९७१ साली ‘मेरे अपने’साठी त्यांनी एक गीत लिहिलं होतं, ‘हाल-चाल ठीक-ठाक है.’ बेकारीची समस्या आणि देशात नावापुरतं कायद्याचं अस्तित्व यावर या गीतात बोचरी टीका होती. या निवडणुकीच्या वेळीही मतदारांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न बेरोजगारीचा आहे. पुढे गुलजार यांनी ‘आँधी’सह विविध चित्रपटांतून देशातल्या परिस्थितीवर आपली लेखणी परजली होती. एकदा त्यांनी लिहिलं, ‘हमारे वोट खरीदेंगे हमको अन्न देकर, यह नंगे जिस्म छुपा देते हैं कफन देकर.’ देशात ज्या पद्धतीनं धर्मवाद नव्यानं हातपाय पसरतोय त्याविषयी लिहिताना गुलजारनी लिहिलं, ‘लोग बंटते ही खुदा बंटने लगे हैं, नाम जो पूछे कोई डर लगता है, अब किसे पूजे कोई, डर लगता है.’ असं लिहिणाºया कवींची सत्ताधाऱ्यांना भीती वाटावी यात नवल नाही. वसईतील अनेक कवींना पोलीस खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्याची गोष्ट तीन-चार दिवसांपूर्वीचीच आहे. एका इराणी चित्रपटात दाखवलं होतं की, स्रीला आपल्यासाठी कोणत्याही नमुन्याचं कुलूप निवडायचं याचं स्वातंत्र्य दिलं जात असे. आपल्या देशातही कुलूप निवडण्याचं स्वातंत्र्य देणारी लोकशाही कधी काळी अस्तित्वात येणार नाही ना, अशी भीती काहीजण व्यक्त करतात; पण गुलजारांसारख्या कवींना सामान्य माणसाच्या जगण्याच्या व तगून राहण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते लिहितात, ‘मारो, कुटो, कत्ल करो या फूँक दो इनको, लोगों में जिंंदा रहने की लामत नही ताकत होती है!’ सामान्य माणसात ही ताकद आहे म्हणूनच तर मरण न येणाºया कवितांना कधी ना कधी मरण येईल, हा विश्वास जागा आहे!(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)