शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

या कवितांना मरण यावं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:15 IST

उदय कुलकर्णी काही काही कविता आणि गाणी जितकी लवकर कालबाह्य होतील तितकं चांगलं. एखादी कविता कालबाह्य होणं म्हणजे जणू ...

उदय कुलकर्णीकाही काही कविता आणि गाणी जितकी लवकर कालबाह्य होतील तितकं चांगलं. एखादी कविता कालबाह्य होणं म्हणजे जणू तिचं मरण.आपल्या कवितेला अमरत्व लाभावं असं अनेकांना वाटतं; पण विंंदा करंदीकरांसारखा कवी मात्र आपल्या एका कवितेला या देशात मरणच येत नाही, अशी सल मनात ठेवून हे जग सोडून गेला. १९५२ साली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंदांनी ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता लिहिली. कवितेच्या काही ओळी अशा होत्या,‘गोड गोड जुन्या थापा,(तुम्ही पेरा तुम्ही कापा)जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग,तुम्ही तरी काय करणार?, आम्ही तरी काय करणार?त्याच त्याच खड्ड्यांमधे, पुन्हा पुन्हा तोच पायजुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी.(जिकडे टक्के तिकडे टोळी),ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता!’लोकसभेची आताची निवडणूक ही सतरावी निवडणूक; पण १९५२ साली लिहिलेली ही कविता तितकीच ताजी असल्याचा अनुभव येतो आहे ना?मंगेश पाडगांवकर हे मराठीतील आणखी एक प्रख्यात कवी. त्यांनी ‘सलाम‘ ही कविता लिहिली. या उपहासात्मक कवितेला आजही टाळ्या मिळतात. ही कवितादेखील मरत नाही. पाडगांवकरांनी लिहिलं होतं,‘या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलामया देशाच्या सुउदात्त, सुमंगल, सुपरंपरेला सलामसर्व बिलंदर घोषणांना सलामजातिभेदाच्या उकीरड्यांना सलामया उकीरड्यांतून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलामनिवडणुकींना सलाम, निवडणूक फंडाला सलाममतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलामससा हाती असलेल्या पारध्यांना सलामत्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलामसलाम प्यारे भाईयों सबको सलाम!’रामदास फुटाणे हे विंंदा व पाडगांवकरांच्या नंतरच्या पिढीतले; पण त्यांची ‘भारत कधी कधी माझा देश आहे!’ ही कविता सुद्धा अमरत्वाच्या दिशेनं वाटचाल करीत असल्याचं प्रत्यंतर येतंय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांचं मतदान एव्हाना पार पडलं आहे. निवडणुकीत कोणाचे प्रचाराचे मुद्दे कोणते हे एव्हाना स्पष्ट झालं आहे. प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरते आहे. गेल्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या विरोधात होते त्याच पक्षाची उमेदवारी घेऊन अनेक उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात आहेत. आपलं कोण आणि परकं कोण, हेच कळू नये अशी स्थिती आहे. सुबुद्ध मतदार त्यामुळं हतबुद्ध झालेला आहे. थेट पंतप्रधानही मागास जातीमुळं आपल्याला लक्ष्य बनवलं जातंय, यासारखे आरोप विरोधकांवर करताना दिसत आहेत. उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी कमीअधिक प्रमाणात ज्या त्या मतदारसंघातील विविध जातिधर्माचे मतदार किती, याचा विचार केला आहे. दुसरा महत्त्वाचा निकष, निवडून येण्याची कुवत म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाण्यासारखा पैसा खर्च करण्याची कुवत!गुलजार हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित. १९७१ साली ‘मेरे अपने’साठी त्यांनी एक गीत लिहिलं होतं, ‘हाल-चाल ठीक-ठाक है.’ बेकारीची समस्या आणि देशात नावापुरतं कायद्याचं अस्तित्व यावर या गीतात बोचरी टीका होती. या निवडणुकीच्या वेळीही मतदारांना सर्वाधिक भेडसावणारा प्रश्न बेरोजगारीचा आहे. पुढे गुलजार यांनी ‘आँधी’सह विविध चित्रपटांतून देशातल्या परिस्थितीवर आपली लेखणी परजली होती. एकदा त्यांनी लिहिलं, ‘हमारे वोट खरीदेंगे हमको अन्न देकर, यह नंगे जिस्म छुपा देते हैं कफन देकर.’ देशात ज्या पद्धतीनं धर्मवाद नव्यानं हातपाय पसरतोय त्याविषयी लिहिताना गुलजारनी लिहिलं, ‘लोग बंटते ही खुदा बंटने लगे हैं, नाम जो पूछे कोई डर लगता है, अब किसे पूजे कोई, डर लगता है.’ असं लिहिणाºया कवींची सत्ताधाऱ्यांना भीती वाटावी यात नवल नाही. वसईतील अनेक कवींना पोलीस खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्याची गोष्ट तीन-चार दिवसांपूर्वीचीच आहे. एका इराणी चित्रपटात दाखवलं होतं की, स्रीला आपल्यासाठी कोणत्याही नमुन्याचं कुलूप निवडायचं याचं स्वातंत्र्य दिलं जात असे. आपल्या देशातही कुलूप निवडण्याचं स्वातंत्र्य देणारी लोकशाही कधी काळी अस्तित्वात येणार नाही ना, अशी भीती काहीजण व्यक्त करतात; पण गुलजारांसारख्या कवींना सामान्य माणसाच्या जगण्याच्या व तगून राहण्याच्या क्षमतेवर विश्वास आहे. ते लिहितात, ‘मारो, कुटो, कत्ल करो या फूँक दो इनको, लोगों में जिंंदा रहने की लामत नही ताकत होती है!’ सामान्य माणसात ही ताकद आहे म्हणूनच तर मरण न येणाºया कवितांना कधी ना कधी मरण येईल, हा विश्वास जागा आहे!(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)