शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Shiv Jayanti Special: कोल्हापूर जिल्ह्यात होत्या आठ शिवकालीन टांकसाळी, उत्खननाची गरज 

By संदीप आडनाईक | Updated: April 29, 2025 12:47 IST

आर्थिक व्यवस्थेवर पडेल प्रकाश

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूरसह बावडा, कागल, कापशी, मलकापूर, निपाणी, पन्हाळा आणि विशाळगड या आठ ठिकाणी शिवकालीन टांकसाळ (नाणी बनवण्याची जागा) चालविल्या जात होत्या. काळाच्या उदरात यातील अनेक जागा जमिनीखाली लुप्त झाल्या आहेत.पन्हाळगडावरील टांकसाळीची जागा ज्येष्ठ इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी शोधून त्यावरचा प्रबंध इतिहास संशोधन मंडळात प्रसिद्धीसाठी पाठवला होता. काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या या जागांचे उत्खनन केल्यास मराठा साम्राज्याची आर्थिक व्यवस्था कशी चालत होती यावर आणखीन माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.मराठा साम्राज्यात, टांकसाळी नाणी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक होत्या, आणि त्या माध्यमातून मराठा साम्राज्याची आर्थिक व्यवस्था चालत होती. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यासाठी नाणी बनवण्यासाठी टांकसाळी स्थापन केल्या. रायगडावर टांकसाळ स्थापन करून मराठा चलनाची सुरुवात केली, आणि कालांतराने, त्यांनी इतर ठिकाणीही टांकसाळी स्थापन केल्या. त्यात पन्हाळगडावर शिवकालीन टांकसाळीचाही समावेश आहे. पन्हाळगड हे एक महत्त्वाचे ठिकाण होते आणि तिथेही टांकसाळ असणे स्वाभाविक होते. पन्हाळगडावरील अंबारखाना येथील धान्य कोठारासमोर टांकसाळ असल्याचा शोध स्व. इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी लावला होता. अंबारखाना म्हणजेच पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा आणि प्रकाश खेळण्यासाठी झरोके आहेत. या शेजारी भूमिगत कोठारामध्ये शस्त्रसाठा आणि चांदीची नाणी तयार करण्याची टांकसाळ होती. याला पन्हाळी रुपया म्हणून ओळखले जात होते.पन्हाळगडाला महत्त्व..महाराष्ट्राच्या इतिहासात पन्हाळगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत म्हणजेच इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात पन्हाळगड बांधला. या किल्ल्याला वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला आहे. कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला हा किल्ला आजही भक्कमपणे उभा आहे आणि या किल्ल्यावर आजही वस्ती आहे. कोकण आणि घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणारे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमुळे नेहमीच गजबजलेले असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंतीFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज