शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2025 Special: कोल्हापूर जिल्ह्यात होत्या आठ शिवकालीन टांकसाळी, उत्खननाची गरज 

By संदीप आडनाईक | Updated: April 29, 2025 12:47 IST

Shiv Jayanti 2025 Special: आर्थिक व्यवस्थेवर पडेल प्रकाश

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूरसह बावडा, कागल, कापशी, मलकापूर, निपाणी, पन्हाळा आणि विशाळगड या आठ ठिकाणी शिवकालीन टांकसाळ (नाणी बनवण्याची जागा) चालविल्या जात होत्या. काळाच्या उदरात यातील अनेक जागा जमिनीखाली लुप्त झाल्या आहेत.पन्हाळगडावरील टांकसाळीची जागा ज्येष्ठ इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी शोधून त्यावरचा प्रबंध इतिहास संशोधन मंडळात प्रसिद्धीसाठी पाठवला होता. काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या या जागांचे उत्खनन केल्यास मराठा साम्राज्याची आर्थिक व्यवस्था कशी चालत होती यावर आणखीन माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.मराठा साम्राज्यात, टांकसाळी नाणी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक होत्या, आणि त्या माध्यमातून मराठा साम्राज्याची आर्थिक व्यवस्था चालत होती. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यासाठी नाणी बनवण्यासाठी टांकसाळी स्थापन केल्या. रायगडावर टांकसाळ स्थापन करून मराठा चलनाची सुरुवात केली, आणि कालांतराने, त्यांनी इतर ठिकाणीही टांकसाळी स्थापन केल्या. त्यात पन्हाळगडावर शिवकालीन टांकसाळीचाही समावेश आहे. पन्हाळगड हे एक महत्त्वाचे ठिकाण होते आणि तिथेही टांकसाळ असणे स्वाभाविक होते. पन्हाळगडावरील अंबारखाना येथील धान्य कोठारासमोर टांकसाळ असल्याचा शोध स्व. इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी लावला होता. अंबारखाना म्हणजेच पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्यकोठारे आहेत. यामध्ये वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. सर्व कोठ्यांना हवा आणि प्रकाश खेळण्यासाठी झरोके आहेत. या शेजारी भूमिगत कोठारामध्ये शस्त्रसाठा आणि चांदीची नाणी तयार करण्याची टांकसाळ होती. याला पन्हाळी रुपया म्हणून ओळखले जात होते.पन्हाळगडाला महत्त्व..महाराष्ट्राच्या इतिहासात पन्हाळगडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत म्हणजेच इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात पन्हाळगड बांधला. या किल्ल्याला वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला आहे. कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला हा किल्ला आजही भक्कमपणे उभा आहे आणि या किल्ल्यावर आजही वस्ती आहे. कोकण आणि घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणारे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांमुळे नेहमीच गजबजलेले असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंतीFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज