शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

राज्यात मोदी लाट नव्हती

By admin | Updated: November 14, 2014 23:33 IST

प्रकाश पवार : कॉँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात होता असंतोष

इचलकरंजी : नवउदारमतवादात फायदा शोधणाऱ्या नव्या पिढीने कल्याणकारी राज्य संस्थेचा अंत आणि सामाजिक न्यायाचा पराभव घडवून आणला. राज्यात मोदी लाट नव्हती, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातील लाट होती. मोदी मतदारांच्या मनातील असंतोषाला वाचा फोडत होते. त्यामुळे त्याचे रुपांतर मतपेटीत होत गेले. हा महाराष्ट्राच्या निवडणुकांचा अन्वयार्थ आहे, असे मत राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केले.येथील समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ‘विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी रमेश लवटे यांनी स्वागत व प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.पवार म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण डाव्या नव्हे, तर उजव्या वळणाकडे जात आहे. सामाजिक जडणघडणीत मोठे बदल घडत आहेत. आज नागरी समाज, उद्योगजगत, बाजारपेठा आणि सोशल मीडिया ७० टक्के राजकारण करीत आहे. अर्थात ते भाजपला पूरक असे राजकारण आहे. मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी या सर्वच समाजात होणारे बदल भाजपला मोठी मदत करीत आहेत. कॉँग्रेसने केलेला विकास त्यांना मांडता आला नाही. माध्यमांनी भाजपला नायक व कॉँग्रेसला खलनायक प्रकारात सादर केले. केवळ मराठा हे मुद्दे आता कालबाह्य झाले असून, मराठी पाठीचा कणा चार ठिकाणी तुटला आहे. यासह महाराष्ट्राच्या राजकारणात विविध स्तरावर होत जाणारे बदल मांडत पवार यांनी अन्वयार्थ मांडला. अन्वर पटेल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)