शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

ग्रामस्वच्छतेसाठी तालुक्यांच्या बक्षिसात भरीव वाढ

By admin | Updated: October 3, 2016 00:44 IST

यंदा पुन्हा मुहूर्त : योजनेचे निकष बदलले; गावांना स्वच्छतेच्या प्रवाहात आणणार

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर गेली दोन वर्षे स्थगित ठेवण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास यंदा पुन्हा मुहूर्त मिळाला आहे. आता काही निकष बदलून ही योजना पुन्हा १ आॅक्टोबरपासून सुरू झाली असून तालुका पातळीवरील बक्षिसांमध्ये शासनाने भरीव वाढ केली आहे. ग्रामीण जनतेच्या आरोग्याचे प्रश्न हे अस्वच्छतेतून निर्माण होतात हे स्पष्ट झाल्यानंतर सन २०००-२००१ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कल्पनेतून या योजनेने आकार घेतला होता. २००२-०३ पासून स्वच्छता व ग्रामविकासामध्ये अव्वल काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य पातळीवर भरघोस बक्षिसे देण्यास सुरुवात केली गेली. गेली १३ वर्षे ही योजना सुरू होती. मात्र, गेली दोन वर्षे ही योजना कार्यान्वित झाली नाही. यंदा मात्र १ आॅक्टोबरपासून ही योजना पुन्हा सुरू होत असून आता तालुका पातळीवरील बक्षिसांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. याआधी जिल्हा परिषद मतदार संघांनुसार बक्षिसे देण्यात येत होती. मात्र, आता यातून जिल्हा परिषद मतदार संघानुसारची बक्षिसे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या बक्षिसांत भरघोस वाढ करण्यात आली आहे. तालुका पातळीवर या अभियानात यश मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींना वरीलप्रमाणे पारितोषिके मिळणार असून जिल्हास्तरावरील पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५ लाख, ३ लाख, २ लाख, विभागीय स्तरावरील ग्रामपंंचायतींना अनुक्रमे १० लाख, ८ लाख, ६ लाख व राज्यस्तरावर २५ लाख, २० लाख व १५ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय तीन विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत तसेच हागणदारीमुक्त जिल्हा परिषदेला २० लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच एका वर्षात जिल्ह्णातील नवीन हागणदारीमुक्त गावे करणाऱ्या जिल्हा परिषदेलाही यंदापासून १० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्व सूत्रे सी.ई.ओं.कडे तालुका आणि जिल्हा पातळीवरील निवड समित्या स्थापन करण्याचे अधिकार या नव्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याआधी तालुका पातळीवर सभापती यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत होती. मात्र, त्यात बदल करून ही समिती करण्याचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.