शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

आरोग्य साहित्यखरेदीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:20 IST

कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.

ठळक मुद्देआरोग्य साहित्यखरेदीची उच्चस्तरीय चौकशी व्हावीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मागणी

कोल्हापूर : कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते; पण ज्यांनी भ्रष्टाचार केला, तेच चौकशी करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेबाहेरील समितीला चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी ठरावीक कालावधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषदेने व्हीटीएम किट्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, थर्मल स्कॅनर यांसह अनेक सुमारे २८ वस्तूंची खरेदी केली. या खरेदीचे दर आणि वस्तूंची संख्या यांवर नजर टाकली तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

या खरेदीसाठी वस्तूंचे उत्पादन मूल्य, बाजारभाव, उपलब्ध दरकरार, पुरवठादार कंपन्या यांचा अभ्यास जिल्हा परिषदेकडून झाला होता की नाही, हाच मुळात एक मोठा प्रश्न आहे. बाजारात ४० रुपयांना मिळणारा मास्क जिल्हा परिषदेला २५० रुपयांना देण्यात आला, असा अजब कारभार झाला आहे. पुरवठादाराच्या फायद्यासाठी हे केले जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी.७०० बेड वाढविणारविभागीय आयुक्त राव व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील पाच रुग्णालयांमध्ये ७०० बेड वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. पुढील १०-१२ दिवसांत ते कार्यान्वित होतील. सध्याच्या या गंभीर स्थितीत प्रशासनाला अनेक पातळ्यांवर लढावे लागत आहे. त्यात मानवी प्रवृत्तीला तोंड देणे जास्त कठीण आहे. या सगळ्यांत खूप वेळ आणि ऊर्जा खर्च होत असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर