शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

आरोग्य साहित्यखरेदीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:20 IST

कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.

ठळक मुद्देआरोग्य साहित्यखरेदीची उच्चस्तरीय चौकशी व्हावीभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मागणी

कोल्हापूर : कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे बुधवारी केली.या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे समजते; पण ज्यांनी भ्रष्टाचार केला, तेच चौकशी करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेबाहेरील समितीला चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी ठरावीक कालावधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषदेने व्हीटीएम किट्स, पीपीई किट्स, एन ९५ मास्क, थर्मल स्कॅनर यांसह अनेक सुमारे २८ वस्तूंची खरेदी केली. या खरेदीचे दर आणि वस्तूंची संख्या यांवर नजर टाकली तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

या खरेदीसाठी वस्तूंचे उत्पादन मूल्य, बाजारभाव, उपलब्ध दरकरार, पुरवठादार कंपन्या यांचा अभ्यास जिल्हा परिषदेकडून झाला होता की नाही, हाच मुळात एक मोठा प्रश्न आहे. बाजारात ४० रुपयांना मिळणारा मास्क जिल्हा परिषदेला २५० रुपयांना देण्यात आला, असा अजब कारभार झाला आहे. पुरवठादाराच्या फायद्यासाठी हे केले जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी.७०० बेड वाढविणारविभागीय आयुक्त राव व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील पाच रुग्णालयांमध्ये ७०० बेड वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. पुढील १०-१२ दिवसांत ते कार्यान्वित होतील. सध्याच्या या गंभीर स्थितीत प्रशासनाला अनेक पातळ्यांवर लढावे लागत आहे. त्यात मानवी प्रवृत्तीला तोंड देणे जास्त कठीण आहे. या सगळ्यांत खूप वेळ आणि ऊर्जा खर्च होत असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर