शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

‘फलोत्पादन’ला दोन वर्षांत दमडीचे अनुदान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:40 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून दोन वर्षांपासून एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्याने ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून दोन वर्षांपासून एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्याने केलेल्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवरील कर्जाच्या व्याजाचा फास शेतकऱ्यांच्या गळ््याला लागला आहे. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिला, असा कितीही डांगोरा पिटला जात असला तरी खुद्द केंद्र सरकारकडूनच निधीवाटपात हात आखडता घेतला जात आहे. राज्याची ६०० कोटींची मागणी असतानाही केवळ १६० ते १९० कोटी रक्कम मंजूर होत आहे. परिणामी लाभार्थी शेतकºयांची प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे.सन २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन्ही वर्षांत एकट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, २२२ शेतकºयांनी हॉर्टनेट प्रणालीवर नोंदणी करून ग्रीन हाऊस उभारणीसाठी अनुदानाची मागणी केली. तालुकानिहाय सोडत काढून त्याची अंतिम यादीही तयार करण्यात आली. ग्रीन हाऊससाठी ८० कोटींची, तर रोपलागवडीसाठी ११ कोटी १० लाखांच्या निधीची मागणी जिल्हा कृषी विभागाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली. यांपैकी किमान ४० टक्के म्हणजेच साडेचार कोटी रुपये आणि ग्रीन हाऊसचे २५ कोटी रुपये तरी मिळतील, असा कृषी विभागाचा अंदाज होता. तथापि,केंद्र सरकारकडून निधीलाच मोठी कात्री लावली आहे.ओल्या आणि कोरड्या दुष्काळांमुळे बेभरवशाच्या शेतीला फूल आणि फळ उत्पादनाची जोड देण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ४० वर्षांपूर्वी फलोत्पादन मोहीम सुरू केली. ५० टक्के अनुदानाच्या या योजनेला चांगले यश आले व त्यातून हजारो शेतकºयांचे संसार फुलले. केंद्रीय कृषिमंत्री असताना पवार यांनी हीच योजना राष्ट्रीय पातळीवर नेली. केंद्रात सरकार बदलल्यानंतर हीच योजना नाव बदलून ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’ या नावाने सुरू राहिली. यात ग्रीन हाऊस आणि रोपलागवड यांचाही अंतर्भाव करण्यात आला. साधारणपणे १० गुंठ्यांचे ग्रीन हाऊस असेल तर त्याला साडेचार लाख रुपये आणि रोपलागवडीसाठी दोन लाख रुपये असे अनुदान मिळते.शेतकरी कर्जबाजारीचायनीज कृत्रिम फुलांनी मार्केट काबीज केल्याने फूल उत्पादक अडचणीत आहेत. सिमला मिरची, कारली, दोडका, काकडी या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले तरी त्यालाही बाजारात दराची शाश्वती नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यातच सरकारकडून अनुदानही वेळेत मिळत नसल्याने ग्रीन हाऊस व शेडनेट उभारणारे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.शेतकºयांना मोठा भुर्दंडग्रीन हाऊस, शेडनेड उभारण्यासाठी किमान १५ लाखांचा खर्च येतो. त्यातील निम्मा वाटा शासन उचलते. निम्म्याची गुंतवणूक स्वत: शेतकºयाला कर्ज काढून करावी लागते. प्रस्ताव सादर करण्यापासून मंजुरीपर्यंत शेतकºयांना कृषी विभागाची पूर्वसंमती, बँकेचे कर्ज यांच्याशी संघर्ष करावा लागतो. उभारणी करण्यासाठी संबंधित तंत्रज्ञांची प्रतीक्षा करावी लागते. एवढे सर्व सोपस्कार करण्यासाठी एक वर्षाचा अवधी निघून जातो. तोपर्यंत घेतलेल्या किमान पाच ते १० लाखांच्या कर्जाचे हप्ते सुरू होतात. एवढे करून प्रत्यक्ष लागवड करण्यासाठी रोपांची मागणी नोंदवून अनुदानाची मागणी केल्यास त्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याने हा किमान शेतकºयांना पुन्हा दोन ते तीन लाखांचा भुर्दंड सोसावा लागतो.