शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

एफआरपी एवढाही दर नाही

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

अजित पवार यांचा शेट्टींना टोला : शेतकरी नेत्यांचे धोरण बोटचेपेपणाचे

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नसताना राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे होता; परंतू सरकारने काहीच केलेले नाही. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आक्रमक असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी यावेळी बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली. भाजपच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आकर्षक आश्वासने देऊन सत्ता मिळविली आणि आता सत्तेत आल्यावर त्यांनी आश्वासनांना बगल देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा घणाघातही पवार यांनी भाजपवर केला. ते म्हणाले की, भाजप नेत्यांनी काळा पैसा भारतात आणतो म्हणून सांगितले, पण तो आणणे काही त्यांना जमले नाही. शेतकरी अवकाळी पावसाने घाईला आला आहे; परंतु त्यांना कसलीही मदत केली नाही. उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नाही .एलबीटी विनाअट रद्द करतो म्हणून व्यापाऱ्यांना आश्वासन दिले, पण आता केंद्र सरकारचा जीएसटी येऊ दे, मग आम्ही एलबीटी रद्द करतो, असे सांगायला लागले आहेत. सत्तेत आल्यावर एक महिन्यात टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले; परंतु टोल रद्द करणे सोडाच त्यांच्याच काळात आता नव्याने पालघरला टोलनाके सुरू केले.